![]()
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चरोजी कर्ज भरलेनसल्यामुळे आता तेथकबाकीदार झाले आहेत. कर्जमाफीची तारीख जून ऐवजी सप्टेंबर ठेवल्यामुळे मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्टकरण्यात आले नाहीत. त्यामुळे कर्जमाफीकशी होणार याची अधिकाऱ्यांनाच काहीमाहिती नाही. त्यामुळे शेतकरवर्गात संभ्रमनिर्माण होत असल्याचे ते म्हणाले. शेतकरी दोन्ही सवलतीपासूनवंचित, ५० हजारांचे नुकसान माजी मंत्री सत्तार यांनी सांगितले की, मीसभागृहात तसेच मुख्यमंत्र्यांनादेखी लपत्र दिले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनीयाबाबत स्पष्टीकरण दिले नाही.शेतकऱ्यंाना दीडपटीने कर्ज द्यावे लागेलतसेच फिरते भांडवल शेतकऱ्यांच्या हातीद्यावे लागेल. नियमित कर्ज भरणारेशेतकरी डिफॉल्टर झाल्यामुळे त्यांना ५०हजारांची सवलत मिळणार नाही. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात १० लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी डिफॉल्टर झाल्यानेबँकेच्या मतदानास मुकणार सत्तार म्हणाले, आता जिल्हा मध्यवर्तीबँकेच्या निवडणुका आहेत. शेतकरीडिफॉल्टर झाला तर मतदानाचेअधिकार मिळणार नाहीत. आताशेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी त्यांनाकिमान दीडपटीने कर्ज द्यावे लागणारआहे. ते दिले तरच शेतकऱ्यांना त्याचाकाही फायदा होईल. अन्यथा त्याच्याहाती काही येणार नाही, असे त्यांनीसांगितले. राज्य सरकारने या बाबततातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. दिलेल्या जाहीरनाम्याचे काय ? शेतकऱ्यांना मदत करेल तो खरा पक्ष.आम्ही निवडणुकीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्यासह्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा वचननामा दिलाहोता. तो शेतकरी आम्हाला विचारत आहे, असे सत्तार यांनी सांगितले.
Source link
कर्जमाफीचे काय झाले; आमदार सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा