Headlines

अमिताभ कांत यांचा कॉलम:देशासाठी एक ‘ईव्ही क्रांती''‎आता झाली खूप गरजेची‎


‎‎‎‎‎‎‎‎‎‎युद्ध सध्या तरी दोन आठवड्यांसाठी थांबले आहे. पण हे‎भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी नक्कीच एक धोक्याची घंटा‎देऊन गेले. आपण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 87‎टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. याचा पाचव्या‎हिश्श्यापेक्षा जास्त भाग अशा भागातून येतो. तो युद्धाच्या‎काळात अत्यंत अस्थिर राहिला आहे. अशा स्थितीत‎पेट्रोलियमच्या प्रश्नाकडे एक धोरणात्मक धोका म्हणून ‎पाहिले पाहिजे. तसेच वाहतुकीच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या ‎माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली पाहिजे.‎भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल ‎‎बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ आपल्या जीडीपीमध्येही ‎‎सुमारे 7 टक्के योगदान देते व लाखोंना रोजगार देते. पण ‎‎आज हे क्षेत्र एका महत्त्वाच्या वळणावर आहे. जागतिक ‎‎स्तरावरील तांत्रिक बदलांमुळे ऑटो इंडस्ट्री ‘इंटरनल ‎‎कम्बशन इंजिन” म्हणजेच ‘आयसीई” तंत्रज्ञानापासून‎वेगाने इलेक्ट्रिफिकेशनकडे वळत आहे. हा बदल ‎‎अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत ‎‎आपण खालील पाच पावले उचलण्याची गरज आहे:‎ 1. ‘आयसीई” वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे उद्दिष्ट‎निश्चित केले पाहिजे. यात 2030 पर्यंत नव्या वाहनांच्या‎विक्रीत 100 टक्के इलेक्ट्रिफिकेशन साध्य करता येऊ‎शकते. युके आणि ईयूने 2035चे उद्दिष्ट निश्चित केले‎आहे. इंडोनेशिया, थायलंड, तैवाननेही ही वाहने‎हटवण्याची कालमर्यादा ठरवली आहे. आपण‎याबाबतीत संथपणा करून चालणार नाही. ‘आयसीई”‎वाहने हटवण्याची स्पष्ट कालमर्यादा उद्योगांना एक‎विश्वास देईल. उत्पादन आणि सप्लाय चेनमध्ये‎गुंतवणूक वाढेल. यातून ईव्ही बाजारपेठ बहरेल.‎
2. चीनमध्ये नव्या कारच्या विक्रीत ईव्हीचा वाटा 50 ‎टक्के आहे. युरोपमध्ये तो 20 टक्क्यांहून अधिक, तर‎अमेरिकेत 10 टक्क्यांहून अधिक आहे. पण भारतात हे‎प्रमाण केवळ 4 टक्केच आहे. अशा स्थितीत या‎क्षेत्राला छोट्या-छोट्या नाही, तर व्यापक रचनात्मक‎बदलांची गरज आहे. ‘कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल‎इफिशियन्सी” (कॅफे) मानकांच्या रूपात धोरणात्मक‎साधने आधीपासूनच उपलब्ध आहेत. ऊर्जा दक्षता‎ब्युरोने पुढच्या टप्प्याचा मसुदा तर जाहीर केला आहे.‎पण मानके अद्याप निश्चित झालेली नाहीत. ही दिरंगाई‎अनिश्चितता निर्माण करते. दरवर्षीसाठी ईव्हीचे स्पष्ट‎उद्दिष्ट ठरले पाहिजे. तसेच खऱ्या प्रगतीला कमकुवत‎करणाऱ्या तरतुदी हटवल्या पाहिजेत. नीती आयोगाच्या‎राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेनुसार 2030 पर्यंत 30 टक्के‎इलेक्ट्रिक कार विक्रीचे उद्दिष्ट निश्चित केले जावे.‎
3. अवजड वाहनांचे इलेक्ट्रिफिकेशन आता केवळ एक‎इच्छा राहिलेली नाही. ते शक्यही आहे आणि गरजेचेही‎आहे. पंतप्रधानांनी संसदेत 15 हजार इलेक्ट्रिक बसेस‎रस्त्यावर आणण्याबाबत आणि वाहतुकीत पर्यायी‎ऊर्जेचा विस्तार करण्याबाबत सांगितले आहे. 10 हजार‎ 900 कोटी रुपयांची ‘पीएम ई-ड्राईव्ह” योजना याच‎कटिबद्धतेचे दर्शन घडवते. आता पुढचे पाऊल म्हणजे‎या बसेसची संख्या वाढवणे. यात खाजगी आणि शालेय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎बसेसचाही समावेश करावा लागेल. ट्रक्सचे‎इलेक्ट्रिफिकेशनही अत्यंत आवश्यक आहे. संसदेच्या‎स्थायी समितीच्या ताज्या अहवालानुसार, ई-बसेस,‎ई-ट्रक्स आणि ई-रुग्णवाहिकांचा वापर सध्या शून्य‎आहे.‎
4. ईव्हीसाठी चार्जिंगचे जाळे असणे गरजेचे आहे.‎देशातील 60 टक्क्यांहून अधिक शहरी लोकसंख्या‎बहुमजली इमारतींमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये राहते.‎तिथे खाजगी चार्जर लावण्यासाठी विविध परवानग्या‎घ्याव्या लागतात. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी भारताला‎‘राईट टू चार्ज”चा कायदा करावा लागेल.‎
5. संपूर्ण यंत्रणा तेलाकडून इलेक्ट्रिककडे वळवणे याचा‎अर्थ आपण आता चीनवर अवलंबून राहावे, असा होत‎नाही. आपल्याला खनिज सोर्सिंग, शुद्धीकरण, सेल‎निर्मिती, पॅक असेंब्ली आणि रिसायकलिंगपर्यंत संपूर्ण‎”बॅटरी व्हॅल्यू चेन”मध्ये आपली क्षमता वाढवावी लागेल.‎
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ ईव्हीमधील बदलांसाठी स्पष्टता आणि‎अंमलबजावणीची गरज आहे. आज‎घेतलेला निर्णय आगामी दशकांसाठी‎सप्लाय चेन, भांडवलाचा ओघ आणि‎तांत्रिक नेतृत्वाची दिशा ठरवेल. ही ५‎कलमी योजना तातडीची गरज आहे.‎

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *