Headlines

नवनीत गुर्जर यांचा कॉलम:इराण-अमेरिका युद्धापासून‎ ते पश्चिम बंगालपर्यंत…‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎




युद्ध का सुरू झाले होते, हे कदाचित खुद्द डोनाल्ड ट्रम्प‎यांनाही माहीत नसेल. पण उशिरा का होईना, अखेर ते‎थांबले. लढून थकलेल्या अमेरिकेला युद्ध‎थांबवण्यासाठी एका निमित्ताची गरज होती. चाळीस‎दिवसांनंतर त्यांना खरोखरच एक उत्तम निमित्त‎सापडले. त्याचे नाव – पाकिस्तान. इराणशी बोलण्याच्या‎स्थितीत तोच होता. शिवाय पाकिस्तानला श्रेय देऊन‎अमेरिकेला अफगाणिस्तान आणि आसपासच्या भागात‎आपली काही कामेही साध्य करून घ्यायची असतील. ‎‎तरीही अमेरिकेने दिलेल्या या श्रेयामुळे पाकिस्तानने‎जास्त हुरळून जाण्याची गरज नाही. ट्रम्प यांच्या जवळ ‎‎जाणाऱ्याला नेहमी फटकाच बसला आहे. कारण त्यांचा‎मूड कधी बदलेल, हे सांगता येत नाही. काहीही असो. ‎‎इराणने अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशाला चांगलेच ‎‎जेरीस आणले. खूप सतावले. खूप रडवले. आता ‎‎युद्धविरामावर सहमती झाली आहे. तेव्हा होर्मुज खुले ‎‎करण्यासाठी इराण आपल्या अटी मान्य करून घेईल. ‎‎युद्धविरामापूर्वीच त्याने आपल्या दहा अटी ठेवल्या‎ होत्या. तिसऱ्या खेळाडूचा म्हणजेच इस्रायलचा विचार‎केल्यास तो सध्या काही अटींवर हल्ले थांबवण्यास‎तयार झाला आहे. पण लेबनॉनला डोळे वटारल्याशिवाय‎तो गप्प बसणार नाही. लेबनॉनवर अधूनमधून हल्ले‎होतच राहतील, अशी भीती कायम आहे. असो, युद्ध‎थांबल्याने जगाचे भले झाले. आता तेल-गॅस आणि‎त्यासंबंधित गोष्टींचे संकट दिसत होते, ते सुमारे एका‎महिन्यात दूर होईल. सर्व काही रुळावर येईल. पुढची‎चर्चाही नक्कीच यशस्वी होईल. कारण अमेरिकेला युद्ध‎थांबवण्याची जास्त घाई आहे.‎ इकडे भारतात एक वेगळेच युद्ध सुरू आहे.‎निवडणुकीचे युद्ध. आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये आज‎मतदान होत आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या‎दोन मोठ्या राज्यांत अनुक्रमे 23 एप्रिल आणि 23 व 29‎एप्रिल रोजी निवडणुका आहेत. केरळमध्ये डाव्यांचा‎डंका वाजतो. तमिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष आहेत-‎द्रमुक आणि अण्णाद्रमुक.‎ निवडणुकीच्या युद्धाचा विचार केल्यास खरे म्हणजे ते‎पश्चिम बंगालमध्ये होत आहे. इथे 71 वर्षीय ममता‎बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सरकारचे‎त्या 15 वर्षांपासून नेतृत्व करत आहेत. इथल्या दीर्घकाळ‎सत्तेत असलेल्या डाव्या सरकारला उखडून‎फेकल्यानंतर 2011 मध्ये ममता पहिल्यांदा सत्तेवर‎बसल्या. माकप सरकारच्या उणिवा त्यांच्या‎कार्यकाळातही पोसल्या गेल्या. भाजपने सुरुवातीपासूनच‎हाच मुद्दा बनवून ममतांना हटवण्याचे आवाहन केले. हे‎युद्ध ममता आणि भाजप यांच्यातच आहे. एकेकाळी‎प्रत्येक राज्यात रुजलेली काँग्रेस इथे नावापुरतीच उरली‎आहे. डाव्यांची तर संपूर्ण फळीच एक प्रकारे उद्ध्वस्त‎झाली आहे. मागील निवडणुकीत भाजप ममतांना हरवू‎शकले नाही. या वेळी त्यांना विजयाची आशा आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पंधरा वर्षांची प्रस्थापितविरोधी लाट भाजपसाठी आशेचा‎किरण आहे. तरीही हे सोपे नाही. इथे भाजपच्या दोनच‎अडचणी आहेत- पहिली भाषा आणि दुसरी स्थानिक‎नेतृत्व. भाजपच्या स्टार प्रचारकांना बंगाली बोलता येत‎नाही. यामुळेच भाषेच्या माध्यमातून संवाद साधता येतो,‎त्यात येणाऱ्या अडचणी स्पष्ट दिसतात. दुसरे म्हणजे‎तिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे कोणताही मोठा स्थानिक‎चेहरा नाही. तृणमूल काँग्रेसमधूनच आलेले शुभेंदू‎अधिकारी हेच भाजपचा नाइलाज बनले आहेत.‎ विजय कुणाचा होईल, हे सांगणे कठीण आहे. पण‎मुकाबला अतिशय अटीतटीचा आहे. 15 वर्षांच्या‎तृणमूलच्या राजवटीत पोसलेले त्यांचे कार्यकर्ते जिवाचे‎रान करत आहेत. शेवटी इतक्या वर्षांत त्यांनाही सत्तेची‎सवय लागलीच आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत‎जिंकायचे आहे. भाजपकडूनही मेहनतीत कोणतीच‎कसर सोडली जात नाहीये. युद्ध सुरूच आहे!‎ अमेरिकेने दिलेल्या या श्रेयामुळे‎पाकिस्तानने जास्त हुरळून जाण्याची‎गरज नाही. तसेही ट्रम्प यांच्या जवळ‎जाणाऱ्या प्रत्येकाला फटकाच बसला‎आहे. कारण त्यांचा मूड कधी बदलेल, हे‎सांगता येत नाही. काहीही असो, इराणने‎अमेरिकेला चांगलेच जेरीस आणले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *