हिंगोली मुख्यमंत्री रोजगार निर्मितीत राज्यात तिसरा:विकास आयुक्तांकडून शाबासकीची थाप, १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार…