Headlines

ऑपरेशन टायगरनंतर दिल्लीत हालचालींना वेग:लोकसभा अध्यक्षांचे ठाकरेंच्या शिवसेनेला आमंत्रण; बाजू मांडण्यासाठी आजच बोलावले




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लोकसभा स्तरावर मोठा धक्का दिला आहे. ९ पैकी ६ खासदारांनी थेट सत्ताधारी गटात प्रवेश केल्यामुळे संसदेत तांत्रिकदृष्ट्या कोंडी झालेल्या ठाकरे गटाला आता लोकसभा अध्यक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले आहे. “तुमची काय बाजू आहे, ती आजच समोर येऊन स्पष्ट करा,” असा महत्वपूर्ण निरोप लोकसभा अध्यक्षांकडून देण्यात आला आहे. या अत्यंत संवेदनशील कायदेशीर लढाईसाठी ठाकरे गटाचे मुख्य नेते दिल्लीत पोहोचले आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार होणारी अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी बंडखोर गटाने २/३ (दोन तृतीयांश) बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर आज, २४ जून रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि खासदार अनिल देसाई हे लोकसभा अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेणार असून, पक्षाचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडणार आहेत. ठाकरे गटाचे मुख्य कायदेशीर मुद्दे बंडखोर ६ खासदारांच्या गटाला स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता दिली जाऊ नये, अशी अधिकृत विनंती यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे केली जाईल. तसेच पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कशी आहे, यावर कायदेशीर युक्तिवाद केला जाणार आहे. बंडखोरीचा ‘इनसाईड’ घटनाक्रम संसदेत स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी बंडखोर खासदारांनी अत्यंत गुप्तपणे केलेल्या हालचालींचा संपूर्ण तपशील आता समोर आला आहे. १६ जून : ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी अचानक मुंबईशी संपर्क तोडला आणि ते दिल्लीत दाखल झाले. १७ जून : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या खासदारांनी रणनीती आखली. १७ जून: अत्यंत पहाटे या सर्व खासदारांनी थेट लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन आपल्या स्वाक्षऱ्यांचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. १७ जून ते २२ जून: संभाव्य कायदेशीर पेच आणि दबाव टाळण्यासाठी ४ खासदारांना जयपूरमधील एका गुप्त हॉटेलमध्ये तर २ खासदारांना इतर सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. २२ जून : मुंबईत आयोजित जाहीर कार्यक्रमात या सर्व खासदारांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय वर्तुळातील चर्चा विधानसभेतील ऐतिहासिक फुटीनंतर आता लोकसभेतही उद्धव ठाकरे यांना ६ खासदारांनी सोडल्यामुळे हा पक्षासाठी मोठा कायदेशीर आणि राजकीय पेच मानला जात आहे. आज ५ वाजता होणाऱ्या लोकसभा अध्यक्षांसोबतच्या या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संसदेतील आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी होतात का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *