![]()
आमच्या पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नाही, मात्र ती प्रत्येक ठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. सध्या सुरू असलेले ‘ऑपरेशन टायगर’ हे वास्तवत: ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे का? यात भाजपमधील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असू शकते. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येऊ द्यायचे नसेल; कारण ते जर दिल्लीत गेले तर कोणाची तरी पंतप्रधानपदाची संधी हुकेल. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातच संपवून टाकण्याचा हा भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा प्रकार असू शकतो, असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते परभणी आणि हिंगोली दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. बंडखोर खासदारांवर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्यासोबत निवडून आलेल्या खासदारांनी केवळ खाजगी निधीसाठी आमची साथ सोडली असून ते सर्व जण पैशांच्या आणि निधीच्या लालसेपोटी शिंदेंसोबत गेले आहेत. वास्तविक पाहता, केंद्र सरकारकडून जो खासदार फंड मिळतो, तोसुद्धा या खासदारांनी पूर्ण खर्च केलेला नाही. हे सर्व खासदार संसदेत आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांवर किती वेळा बोलले? कोणत्या केंद्रीय मंत्र्यांकडे मतदारसंघाच्या विकासासाठी गेले? या सर्वांचा कच्चाचिठ्ठा आणि संपूर्ण आढावा आमच्याकडे तयार आहे. गद्दारी करत आमचे सरकार पाडले देशातील आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे म्हणाले की, आज देशातील आणि राज्यातील कोणत्याच वर्गात समाधान किंवा संतोष दिसून येत नाही. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी प्रामाणिकपणे जनतेची कामे करण्याचा प्रयत्न करत होतो. दुर्दैवाने आमचे सरकार गद्दारी करून पाडण्यात आले; कारण आम्ही जे चांगले काम करत होतो, ते या विरोधकांना बघवले नाही. हे लोक केवळ समाजात आणि जाती-जातींमध्ये वाद निर्माण करून सत्ता उपभोगत आहेत. आज राज्यात कुठे पेपर फुटत आहेत, तर कुठे खासदार फुटत आहेत. संपूर्ण राज्यात आज कोणीही आनंदी दिसत नाही. गद्दारीच्या मुळावरच घाव घालावा लागणार उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, बंडू जाधव यांच्यासारख्या लोकांकडे जर आम्ही आधीच लक्ष दिले असते, तर त्यांच्या अनेक भानगडी आम्ही केव्हाच बाहेर काढल्या असत्या. आता केवळ वरवर बोलून चालणार नाही, तर गद्दारीच्या मुळावरच घाव घालावा लागणार आहे. मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसले आहेत. शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांना जनतेने निवडणुकीत ठरवून पाडले पाहिजे. जर या गद्दारांना आताच चिरडले नाही, तर हा देश वाचणार नाही. ज्यांनी पक्षाची आणि देव-देशाची शपथ घेऊन आम्हाला सोडले, त्यांना त्यांचे दुष्परिणाम लवकरच भोगावे लागतील. मतदारांची मागितली क्षमा उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, परभणीकरांनी आमच्या पक्षाचा महापौर निवडून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी आज सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आणि मतदारांची जाहीर क्षमा मागण्यासाठी येथे आलो आहे. कारण परभणी-हिंगोलीतील जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अत्यंत विश्वासाने मतदान केले होते, पण हे लोक आपल्याला सोडून गेले. या निवडून दिलेल्या खासदारांनी गद्दारी केली असली, तरी देखील सामान्य शिवसैनिक नेहमी आमच्यासोबतच राहतो, हा परभणी आणि हिंगोलीचा इतिहास आहे.
Source link
देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच संपवण्याचा भाजपचा डाव?:मुंबईत गद्दारांचे शिरोमणी बसलेत, त्यांना चिरडल्याशिवाय देश वाचणार नाही- उद्धव ठाकरे