Headlines

आत्रामांनी 5 खासदारांची नावे सांगावी:ते माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, खासदार फुटीच्या दाव्याची सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली




दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात असतो. आम्ही सर्व जण खरगे यांच्या ऑफीसमध्ये बसून चर्चा करत असतो, कोण काय बोलणार, कोणत्या बिलावर चर्चा करणार यावर आम्ही सर्व काही ठरवतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 5 खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात असे धर्मरावबाबा आत्रात यांनी म्हटले असेल तर त्यांना माझ्या पेक्षा जास्त माहिती असेल, आता काही घडून यायचा विषय नाही. त्यांच्यकडे जर 5 खासदार कोण ही माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावे. मी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे, ते माझ्याशी बोलत नाही माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ..लोकशाही संपुष्ठात आली सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या देशात लोकशाही संपुष्ठात आली आहे का असे आम्हाला वाटते आहे आहे. घरं, पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. निवडणूक 3 वर्षांवर आलेली असताना पक्ष फोडण्याची घाई कसली आहे. एखाद्या चांगल्या बिलसाठी विरोधी पक्षसुद्धा मदत करत असतो. जीएसटीचे बिल ज्यावेळी आले त्यावेळी काँग्रेसने सुद्धा सरकारला मदत केली आणि एकमताने बिल पास केले. पण एक बिल पास करण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम सुरू झाल्याने देशात लोकशाही आहे का नाही असा प्रश्न पडतो. ..तर जनतेसाठी कोण बोलणार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वच जण सत्ताधारी पक्षात गेले तर लोकांसाठी बोलणार कोण? विरोधी पक्ष राहणारच नाही ना, अशी परिस्थिती देशात झाली आहे. मविआच्या बैठकीसंदर्भात शशिकांत शिंदे यांना आमच्या आमदारांबद्दल सर्व माहिती होती. या प्रकरणी सतेज पाटील आणि शशिकांत शिंदे मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधतील. सरकारकडून एनसीआरटीचा गैरवापर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारकडून एनसीआरटीचा सातत्याने गैरवापर करतंय असे मत शिक्षणतज्ञ करत आहेत. सरकारकडून त्यांची विचारधारा शिक्षणाच्या माध्यमातून नवीन पिढीवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी या मार्फत नवे गणित बांधायचा प्रयत्न करत आहेत ते नव्या पिढीच्या विचारधारेसाठी हे घातक ठरू शकते. सहकारमध्ये राजकारण करू नये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बँकेची निवडणूक ही सहकारचे निवडणूक असते. मुंबई बँकेचा विचार केला तर त्यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. सहकारमध्ये राजकारण आणू नये हीच आमची भूमिका राहिलेली आहे. यामध्ये पक्ष बाजूला असला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 महिन्याच्या मुलाला दुसऱ्या मुलाने जी मारहाण केली अशी घटना कुठल्याही शाळेत होऊ नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *