Headlines

नालेसफाईची पाहणी करणाऱ्यांना त्याच नाल्यात अंगठे धरून उभं केलं पाहिजे:महापौरांच्या दौऱ्यात मॅनहोल उघडेच कसे? भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संदीप देशपांडे




मुंबईत पहिल्याच पावसाने पाणी साचल्याने मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. एप्रिल-मे महिन्यात नालेसफाईची पाहणी करण्याचे नाटक करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्याच नाल्यांमध्ये अंगठे धरून उभे केले पाहिजे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. संदीप देशपांडे यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर मराठी माणसांवर दादागिरी केल्याचा आणि अनेक घोटाळे केल्याचा थेट आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मेहतांवर काय कारवाई करणार? ते ‘नरेश’ आहेत म्हणून त्यांना पाठीशी घालणार की शिक्षा देणार, हे आता पाहावे लागेल,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, नालेसफाई पारदर्शक झाल्याचा दावा करणाऱ्या अमित साटम यांनाही पायाची बोटे धरायला लावून नाल्यात उभे केले पाहिजे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या कारणांवरूनही त्यांनी आक्षेप घेतला. महापौरांना ट्रोल केलं, पण भ्रष्ट अधिकारी मोकाटच महापौर स्वतः पाहणी दौऱ्यावर जातात, तिथे मॅनहोल उघडे दिसतातच कसे?” असा सवाल करत देशपांडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या ढिसाळ कारभारासाठी महापौरांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले, पण मॅनहोल उघडे ठेवणाऱ्या आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मूळ दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही? सत्ताधारी पक्ष या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी का घालत आहे? त्यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का? असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला. तोपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारणार नाही मनपाचे सर्व अभियंते भ्रष्टाचारी असल्याचा पुनरुच्चार करत देशपांडे म्हणाले की, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होत नाही, तोपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारणार नाही. तसेच, राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि संपुष्टात येत चाललेल्या सामाजिक संवेदना यावरही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *