Headlines

Admin

553 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर:लवकरच मतदार यादी, निम्म्या जिल्ह्यात आचारसंहिता

अमरावती जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होईल, त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली जाईल. या ग्रामपंचायती जिल्ह्याच्या निम्म्या भौगोलिक क्षेत्रावर पसरलेल्या असल्याने निवडणुकीच्या काळात तेथे आचारसंहिता लागू होईल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी…

Read More

मे महिन्याच्या ग्रामसभेत जनगणना, पाणीटंचाईवर होणार चर्चा:सीईओ गांधींनी परिपत्रक काढले, स्व-गणनेवर विशेष लक्ष

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मे महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. या ग्रामसभांमध्ये जनगणना आणि संभाव्य पाणीटंचाई या दोन महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. पंचायत विभागामार्फत हे परिपत्रक सर्वदूर पाठविण्यात आले आहे. भारत सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात झाली…

Read More

विद्यार्थिनींनी पदवीसोबतच कौशल्य आत्मसात करावे:कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांचे प्रतिपादन

अमरावती येथील नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या महिला महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थिनींना पदवीसोबतच कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. सध्याच्या धकाधकीच्या काळात केवळ शिक्षणाच्या आधारे नोकरी मिळवणे कठीण झाल्याचे त्यांनी नमूद केले. या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. असनारे उपस्थित होते. नूतन विदर्भ शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष…

Read More

राज ठाकरेंना पोलिसांनी समज द्यावी:नसरापूर प्रकरणावरून असीम सरोदेंनी राज ठाकरे आणि प्रवीण तरडेंना सुनावले

नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असली, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करणे चुकीचे असल्याचे मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. एका जबाबदार नेत्याने असे चिथावणीखोर वक्तव्य करणे अयोग्य असून पोलिसांनी त्यांना समज द्यायला हवी, अशी भूमिका सरोदे यांनी मांडली. तसेच, याप्रकरणी प्रवीण…

Read More

पुण्यात 9 वर्षीय नातीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न:नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; संतप्त जमावाचा राडा

पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच 9 वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा परिसरात संबंधित 50 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिचे कपडे काढले आणि तिच्यावर…

Read More

जालंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर स्फोट, एक जखमी:स्कूटीमध्ये स्फोटके ठेवल्याची शक्यता, एक किमी दूरपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज

जालंधरमध्ये BSF मुख्यालयाजवळ स्फोट झाला. त्याचा आवाज सुमारे 1 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला, ज्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ज्या ॲक्टिव्हा स्कुटीमध्ये स्फोट झाला, ती कथितरित्या एका फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे. तो संध्याकाळी सुमारे 8:15 वाजता स्कुटी उभी करून BSF मुख्यालयाच्या आत पार्सल देण्यासाठी गेला होता, त्याचवेळी मागे स्कुटीमध्ये स्फोट झाला….

Read More

कर्जत-जामखेडला अखंडित वीज द्या:प्रा. राम शिंदे यांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश, महावितरणचा घेतला समाचार

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व…

Read More

अखेर SRPF गट 5 अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा स्थगित:अपर पोलिस महासंचालकांकडून कारवाई; 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे आले होते छापून

महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी प्रकाशनाच्या सराव पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न या परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, पोलिस भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या…

Read More

पुणे मनपाकडून गणेशखिंड रस्त्यावरील हेरिटेज वृक्षतोडीचा घाट:नियमांना बगल देत शेकडो झाडे कापण्याचा आरोप: वंदना चव्हाण

पुणे महानगरपालिकेने गणेशखिंड रस्त्यावरील ५० वर्षांहून अधिक जुन्या ‘हेरिटेज’ वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी माजी खासदार वंदना चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. महापालिकेने वृक्षतोडीसाठी नियमांना बगल दिली असून, संबंधित अधिकाऱ्यांना नियमावलींची माहिती नसल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. वृक्ष संरक्षण कायद्यानुसार, हेरिटेज झाडे कापण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत; यासाठी राज्य वृक्ष प्राधिकरणाची…

Read More

आसामच्या 126 आमदारांपैकी 63 पुन्हा निवडून आले:107 आमदार करोडपती, बदरुद्दीन यांची मालमत्ता ₹226 कोटी; काँग्रेसच्या 16 आमदारांवर फौजदारी खटले

आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. 126 आमदारांपैकी निम्मे आमदार म्हणजेच 63 आमदार पुन्हा निवडून आले आहेत. नवीन निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी 21 (17%) आमदारांवर गुन्हेगारी आणि 19 (15%) आमदारांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने हा अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, 3 आमदारांवर खुनाचा प्रयत्न आणि 2 आमदारांवर महिलांविरुद्ध…

Read More