दहशतवादाशी लढताना पोलिसांचे बलिदाने जास्त:तरीही आम्हीच उपेक्षित, टीकेचे धनी ठरतो पण देशासाठी प्राणही देतो!- आयजी सुनील फुलारी
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पोलिस दलाची व्यथा मांडली आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना देशातील पोलिस दलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे, असे ते म्हणाले. तरीही पोलिस दल उपेक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 75 वर्षांतील आकडेवारीनुसार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांमध्ये सशस्त्र दलांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक आहे. असे असूनही,…