Headlines

बारामतीत प्रचाराला जाणार- रोहित पवार:निवडणूक उमेदवारावर नाही, तर अजित पवार यांच्या कामावर होत आहे

“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते. बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार….

Read More

शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही:पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत लिहिलेला लेख आणि त्यातील विधानांवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. “शरद पवारांचा वारकरी विचारांशी कधीही जवळचा संबंध राहिलेला नाही. शरद पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदोन मोठे असले, तरी त्यांचा पिंड निधर्मी आहे. त्यांनी लिहिलेला लेख अत्यंत चुकीचा असून, त्यांनी अशी भूमिका मांडावी याचे…

Read More

भक्ती शक्ती-चाकण मेट्रो मार्गिकेचा सुधारित अहवाल:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे सादर; 12 हजार 937 कोटी खर्च अपेक्षित

भक्ती शक्ती-वाकड-नाशिक फाटा-चाकण या महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. हा अहवाल २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला. पिंपरी-चिंचवड परिसरातील वेगाने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाढत्या प्रवासी गरजा लक्षात घेऊन या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक भागांमधील दळणवळण अधिक सुलभ…

Read More

धामोडी पारधी बेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था:दीड किलोमीटरच्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी

दर्यापूर तालुक्यातील धामणा गावातील पारधी बेड्याकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या ‘आदर्श गाव’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या योजना असल्या तरी, या शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या गावाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणा गाव धामोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या गावाला जाण्यासाठी…

Read More

जिल्हा परिषदेचे सीईओ गांधींनी सुटीच्या दिवशी घेतली बैठक:गाव-खेड्यांतील योजनांच्या अंमलबजावणीची जाणून घेतली वास्तविकता

अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व १४ गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेतली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजनांची गाव-खेड्यांमधील अंमलबजावणी आणि त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सीईओ गांधी यांनी बीडीओंकडून गाव-खेड्यांची सध्याची वास्तविकता आणि विविध लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीचे सूत्र समजून घेतले. सीईओंच्या…

Read More

मेळघाटातील आमझरी मधाला नवी ओळख:देशभरात उपलब्ध होणार; खादी-ग्रामोद्योग, वन विभाग, ग्रामपंचायतमध्ये सामंजस्य करार

मेळघाटातील ‘मधाचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. हा सामंजस्य करार अमरावती येथील महसूल भवनात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मेळघाटातील…

Read More

वेरूळ घृष्णेश्वर विकास कामांचा जिल्हाधिकारी गौडांनी घेतला आढावा:कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील घृष्णेश्वर विकास आराखड्यातील कामांचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच आढावा घेतला. भक्तनिवास, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शनबारी, रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठा आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासह विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा यात समावेश होता. या बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, सहायक जिल्हाधिकारी अंकिता ताकभाते, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उप वनसंरक्षक सुवर्णा…

Read More

नदी सुशोभीकरणात पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्या – पंकजा मुंडे:पुणे येथे मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा आढावा

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरण करताना पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उपायांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथे राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला महानगरपालिका…

Read More

कॉर्पोरेट जिहादमध्ये मुलींना गोमांस खाण्यास भाग पाडले- मंत्री महाजन:नाशिकच्या आयटी कंपनीत पैसे, नोकरीचे आमिष, मुली-मुलांचे धर्मांतर

नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून…

Read More