"निळवंडे'चे पाणी घराघरात पोहोचवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय -थोरात:राजकारण सत्तेसाठी नव्हे , तर गरिबांच्या जीवनात आनंद निर्माणासाठी
प्रतिनिधी | संगमनेर “निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचवणे, हेच माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यक्रमात ते…