![]()
बदलते हवामान, पाण्याचे संकट आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने लक्षात घेता शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) अधिक सक्षम व शाश्वत होण्याची गरज असल्याचा संदेश करमाळ्यात आयोजित दोन दिवसीय एक्सपोजर-संवाद कार्यक्रमातून देण्यात आला आहे. वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (व
.
कम्युनिटी आणि इकोसिस्टम रेझिलियन्स उभारण्यात एफपीओंची भूमिका या विषयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, एफपीओ, एफपीसी प्रतिनिधी, संचालक आणि प्रकल्प समन्वयक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले होते. यावेळी वॉटर संस्थेचे डायरेक्टर संदीप जाधव, हरीश डावरे, संपदा ट्रस्टचे डायरेक्टर अनिरुद्ध मिरीकर, रिजनल मॅनेजर अभिजीत कवठेकर, प्रकल्प अधिकारी कांतीलाल गीते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
पहिल्या दिवशी प्रत्यक्ष भेटी या व्यापक कार्यक्रमात अफार्म, बायफ, टेक्नोसर्व्ह, ईसाफ, नॅशनल ॲग्रो फाउंडेशन, मानवलोक, स्विच ऑन फाउंडेशन, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, लोकसाथी प्रतिष्ठान, राष्ट्रविकास ॲग्रो फाऊंडेशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.