![]()
हिंदवी रेणुराई गोंधळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी लोककलावंतांच्या मागण्यांसंदर्भात नुकतीच आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील लोककलावंतांच्या मागण्या आमदारांनी मांडाव्यात, अशी विनंती धुमाळ यांनी यावेळी केली. पारंपरिक लोककलावंतांची निवड इष्टांक ५०० पाचशे करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने आणि या जिल्ह्यात एकूण १४ तालुके असल्याने कलावंतांची निवड करण्यासाठी इष्टांक ५०० करावा आणि लोककलावंतांच्या मानधनामध्ये वाढ करून ते प्रतिमहा १० हजार रुपये करावे, असे धुमाळ यांनी निवेदनात म्हटले आहे. लोककलावंत हे भारतीय संस्कृतीचे रक्षक आहेत. पाऊसपाणी, ऊन वा थंडी अशा कोणत्याही ऋतूत ते आपल्या रोजीरोटीसाठी कला सादर करून संस्कृतीचे रक्षण करतात. यामधून त्यांना अत्यंत अल्प मानधन मिळते. त्यामुळे त्यांना शासकीय मदतीची आवश्यकता आहे. याचा सहानुभूतीने विचार करून शासनाने लोककलावंतांना मानधन वाढवून द्यावे, अशी आग्रहाची मागणी धुमाळ यांनी या निवेदनातून केली आहे.
Source link
लोककलावंतांच्या मानधनात वाढ करा- दशरथ धुमाळ:अधिवेशनात मागण्या मांडण्याची आ. जगताप यांना विनंती