Headlines

ऊसतोड मजुराचे अपहरण; चार दिवस‎ छळ, तोंडात लघुशंका करून मारहाण‎:जखमी मजुरावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू‎




उचलीचे 50 हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून ‎ऊसतोड मजुराचे अपहरण करून त्याला 4 दिवस डांबून ‎ठेवले. या काळात त्याला बेदम मारहाण करुन छळ केला.‎ तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला ‎आहे. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा नोंद करुन‎ घेतला नाही, असा आरोप आहे. देविदास कापसे‎(रा.उमापूर, ता.गेवराई) असे मारहाण झालेल्या ऊसतोड‎ मजुराचे नाव आहे, तर अपहरणाची दुसरी घटना‎ मांजरसुंबा घाटात घडली. संशयितांनी तरुणासह त्याच्या‎ वडिलांचे अपहरण केले. त्यांना 2 दिवस डांबून 1.80‎ लाखांची खंडणी उकळली.‎ गणेश दरम्यान, थोरात (रा. खांडवी, ता. गेवराई) या‎ मुकादमाकडून कापसे यांनी 2 लाख रुपयांची उचल ‎घेतली होती. यातील दीड लाख रुपये त्यांनी फेडले होते, ‎तर 50 हजार रुपये बाकी होते. यातून 2 जुलै रोजी देविदास ‎हे दोन मित्रांसह गेवराईला गेले असताना बेलगाव ‎फाट्यावरून त्यांचे मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या‎ काही सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केले.‎त्यानंतर त्यांना कर्नाटकातील कारखान्यात नेण्यात आले.‎तिथून पुन्हा पुणे जिल्ह्यातील घोडनदी शिरुरमध्ये नेले. ‎तिथे शेडमध्ये दोन दिवस डांबून लाथाबुक्क्यांनी आणि ‎काठ्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तोंडात ‎लघुशंका करून छळ केला.‎ तक्रार दिली नाही- पवार‎ या प्रकरणात पिडीत मजुराचे आई,‎भाऊ आले होते. आमच्या अंमलदारांनी‎ योग्य ती चौकशी केली व स्टेशन‎ डायरीला नोंद घेतली. मी असताना‎ नातेवाईक आले. त्यांना तक्रार देण्यास‎ सांगितली होती मात्र त्यांनी सरपंच व‎ इतर व्यक्तींच्या मार्फत ठाण्याच्या‎ बाहेरच प्रकरण आपसात मिटवून‎ घेतले. तक्रार नसल्याने गुन्हा नोंद नाही.‎असे, गेवराईचे पीआय किशोर पवार ‎म्हणाले.‎ मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला मी ओळखतो‎ ‎मी गेवराईहून 2 मित्रांसह जाताना कार थांबली. त्यातील‎‎ लोकांनी काही कळण्याच्या अपहरण करून कर्नाटकात ‎‎नेले. तिथे मला गाडीतच ठेवून कारखान्याच्या लोकांशी‎‎ चर्चा केली. नंतर घोड नदी शिरूर परिसरात नेऊन‎‎ मारहाण केली. माझ्या तोंडात लघुशंका केली. मी फक्त‎‎ गणेश थोरातला ओळखतो इतरांना नाही.‎ 0देविदास कापसे, ऊसतोड मजूर‎ मुलासह वडील अपहरण प्रकरणी 6 ‎जणांवर नेकनूर पोलिसांत गुन्हा‎ बीड | सोलापूर-धुळे हायवेवरील मांजरसुंबा घाटात ‎कारला जीप आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवत ‎दोघांचे अपहरण केले. नंतर 2 दिवस डांबून ठेवून रोख‎ रक्कम, सोन्याची अंगठी अशी 1 लाख 80 हजाराची खंडणी‎ उकळली. या प्रकरणी 6 जणांवर नेकनूर पोलिसांत गुन्हा नोंद‎ केला.‎ श्रीपाद गंगाधरराव कुलकर्णी (50, रा. पैठण रोड, छत्रपती‎ संभाजीनगर; मूळ रा. वालवड, ता. भूम) हे 3 जुलै 2026‎ रोजी सायंकाळी 5 वाजता कारने मानलेले वडील‎ विजयसिंह रणनवरे आणि मानलेली आत्या सुवर्ण माला‎रणनवरे यांच्यासह वालवड (ता. भूम) येथून छत्रपती‎ संभाजीनगरकडे जात होते. बीड तालुक्यात मांजरसुंबा ‎घाटात पाठीमागून आलेल्या एका जीपने त्यांच्या गाडीला ‎ओव्हरटेक करून आडवे लावले. वाहनातील उदयसिंह ऊर्फ‎ सोनू सत्यजितसिंह जाधव (रा. गणेगाव, ता. भूम, जि.‎धाराशिव), अझर सय्यद (रा. बेलगाव पिंपळगाव, ता. भूम,‎जि. धाराशिव), निखिल (पूर्ण नाव माहीत नाही, रा.‎बेलगाव पिंपळगाव, ता. भूम), राहुल काळे (रा. भूम, जि.‎धाराशिव) व अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी कोयत्याचा‎ धाक दाखवून त्यांना उतरण्यास सांगून अपहरण केले.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *