Headlines

राज्यभरात 20 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार:13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, बळीराजाला दिलासा




राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० जुलैपासून महाराष्ट्रातील विविध भागांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘या’ भागांना यलो अलर्ट अन् विजांचा इशारा हवामान विभागाने आज सोलापूर, धाराशिव आणि कोकणातील काही भागांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला असून, पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना यामुळे जीवदान मिळणार आहे. हवामानात नेमके काय बदल होत आहेत? सध्या देहरादून, पाटणा आणि बांकुरा या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात समुद्रसपाटीपासून ९०० किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दुसरीकडे, उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. मध्येच अफगाणिस्तानच्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवाहात काहीसा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या दोन ते तीन दिवसांत हा प्रभाव पूर्णपणे ओसरून देशात आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल. मुंबई, पुण्यात हजेरी; नाशिकमध्ये हुलकावणी गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांत पावसाने पुन्हा एकदा चांगली हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेतील गारव्यामुळे दिलासा मिळाला. मुंबईत तर जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. एकीकडे राज्यभरात पावसाचे पुनरागमन होत असताना, नाशिकमध्ये मात्र केवळ ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आणि पावसाने हुलकावणी दिली. मात्र, पुढील काही दिवसांत संपूर्ण राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा स्पष्ट अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हेही वाचा.. ओडिशामध्ये रथयात्रेदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा:आसाममधील 99 गावे पुराच्या विळख्यात, अरुणाचलमध्ये 1 लाखांहून अधिक लोक प्रभावित
हवामान विभागाने म्हटले आहे की, गुरुवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तर, ओडिशातील जगन्नाथ रथयात्रेपूर्वी बुधवारी पाऊस झाला. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये रथयात्रेदरम्यानही मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये पुरीचाही समावेश आहे. हा इशारा बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जारी करण्यात आला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *