Headlines

माजी 'आप' नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या शिक्षेवरील निर्णय लांबणीवर:27 जुलैला होणार युक्तिवाद; 2020 च्या दिल्ली दंगलीत IB अधिकारी अंकित शर्मांच्या हत्येचे प्रकरण




आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात माजी ‘आप’ नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यासह पाच दोषींच्या शिक्षेवर आज युक्तिवाद होणार होता, पण दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने सुनावणी २७ जुलैपर्यंत पुढे ढकलली. ताहिर हुसैन यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने हा निर्णय घेतला. न्यायालयाने सर्व दोषींच्या वकिलांना त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती (सोशियो-इकोनॉमिक स्टेटस) दर्शवणारे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देशही दिले. कडकडडूमा न्यायालयाने १३ जुलै रोजी ताहिर हुसैन, नाजिम, काशिम, अनस आणि जावेद यांना हत्या, अपहरण, दंगल आणि जातीय सलोखा बिघडवल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. तर, ११ आरोपींपैकी ६ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. हिंसाग्रस्त परिसरातील नाल्यात सापडला होता अंकितचा मृतदेह हे प्रकरण दयाळपूर पोलीस ठाण्यात अंकित शर्मा यांचे वडील रविंदर कुमार यांच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले होते. 25 फेब्रुवारी 2020 रोजी अंकित शर्मा कार्यालयातून घरी परतल्यानंतर पुन्हा बाहेर गेले होते, परंतु बराच वेळ ते परत आले नाहीत. कुटुंब त्यांचा शोध घेत होते, तेव्हा लोकांनी सांगितले की त्यांची हत्या करून मृतदेह चांदबाग पुलाजवळच्या खजुरी खास नाल्यात फेकून दिला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी नाल्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला होता. रविंदर कुमार यांचा आरोप होता की, त्यांच्या मुलाची हत्या तत्कालीन आप (AAP) नगरसेवक ताहिर हुसैन आणि त्यांच्या साथीदारांनी केली. तक्रारीनुसार, आरोपी ताहिर हुसैन यांच्या कार्यालयात जमा झाले होते आणि हत्येनंतर अंकितचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर आम आदमी पार्टीने ताहिर हुसैन यांना निलंबित केले होते. 24 मार्च 2023 रोजी न्यायालयाने ताहिर हुसैन यांच्यासह 11 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले होते. CAA विरोधातील आंदोलनादरम्यान दंगल झाली होती 23 फेब्रुवारी 2020 रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) विरोधी आणि समर्थक समोरासमोर आले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली होती. 26 फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या दंगलीत 53 लोकांचा बळी गेला आणि 250 हून अधिक लोक जखमी झाले होते. मरण पावलेल्यांमध्ये 38 मुस्लिम आणि 15 हिंदू होते. सुमारे 800 दुकाने जाळण्यात आली. 500 हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *