![]()
शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आणि देशाच्या राजकारणातील ‘पुराण पुरुष’ आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचे म्हणणे ऐकून विचार केला असला, तरी सरकारला खरा धक्का जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानेच दिला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीमुळे देशभरात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कायद्याच्या राज्यात आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे याप्रकरणी पंतप्रधानांपासून ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. फडणवीस शिक्षणमंत्री होणार संजय राऊत म्हणाले की, जोशी हे फक्त कोळसामंत्री म्हणून चांगले काम करू शकतात. नवीन मंत्री आल्यावर कालचा गोंधळ बरा होता असे म्हणायची वेळ येईल. त्यांना नीट म्हणजे काय, हे आधी विचारले पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हे मंत्रीपद दिले जाऊ शकते आणि पंतप्रधानांनी तसे ठरवले असण्याची शक्यता वर्तवत, तसे झाले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपकडे संयम-विनम्रता नाही संजय राऊत म्हणाले की, संयम आणि विनम्रता हे शब्द भाजपच्या शब्दकोशातून गायब झाले आहेत. पण जेव्हा युवा शक्तीपुढे मोदींसारख्या नेत्यांना झुकावे लागते, तेव्हा हिटलरसारख्या सत्ताधीशांना झुकवल्याचा आनंद जनतेला होतो. या लढ्यात 21 मुलांचे बळी गेले असून अनेकांचे डोके फुटले आहे, असे सांगत आधी नियोजित असलेला मोर्चा रद्द करून आता कोणतीही पक्षीय निशाणी न वापरता ‘तिरंगा रॅली’ काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांसारखे विरोधकांनी एकत्र यावे संजय राऊत म्हणाले की, तरुणांच्या विचार आणि भाषेपुढे आयटी सेलला हार मानावी लागली. बहुमताचा माज दाखवून हिटलरसारखे वागाल, तर सत्तेतून तसेच बाहेर जावे लागेल, हा धडा राज्यकर्त्यांनी घ्यावा. जंतर-मंतरवर सर्व विद्यार्थी संघटना एकत्र आल्या, तसेच मतचोरी आणि आमदार-खासदार फोडाफोडीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले, तर मोदी सरकार एक दिवसही टिकणार नाही. उद्धव ठाकरेंची इंडिया आघाडीच्या नेत्यांशी चर्चा संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी फोनवर जवळपास 35 मिनिटे चर्चा केली असून, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याशीही संवाद साधला आहे. ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, ते मोडून काढण्यासाठी ही चर्चा झाल्या.
Source link
जंतर-मंतरच्या धक्क्याने हिटलरशाही झुकली:बहुमताचा माज दाखवू नका, अन्यथा सत्तेतून बाहेर व्हावे लागेल, संजय राऊतांचा भाजपला इशारा