Headlines

Admin

राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता:रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाचा निकाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत… Source link

Read More

मुंबईच्या समुद्राची 'हायटेक' स्वच्छता:कचरा हटवण्यासाठी BMC कडून मानवरहित बोटी; दररोज 80-90 किलो कचरा होतो गोळा

मुंबईकरांचा अभिमान आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या समुद्रात वाढलेला कचरा हटवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी तैनात करण्यात आल्या असून, या अत्याधुनिक बोटींच्या मदतीने समुद्रातील अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा…

Read More

ट्विशाचा मृतदेह -80° तापमानाच्या शवगृहात ठेवण्याचे आदेश:एम्सने म्हटले- आमच्याकडे सुविधा नाही; कोर्टाने पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी फेटाळली

भोपाळमधील बहुचर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात नवीन वळण आले आहे. न्यायालयाने पुन्हा शवविच्छेदनाची मागणी फेटाळून लावली, परंतु मृतदेह सुरक्षित ठेवण्याच्या आदेशाने पोलीस आणि न्यायवैद्यक विभागाच्या अडचणी वाढवल्या आहेत. न्यायालयाने ट्विशाचा मृतदेह कुजण्यापासून रोखण्यासाठी -80° सेल्सिअस तापमानावर सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, राज्यातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालय किंवा सरकारी रुग्णालयात इतक्या कमी तापमानाची सुविधा उपलब्ध नाही….

Read More

सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये:22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात? चर्चा रंगताच डॅमेज कंट्रोल प्लॅन; सुनील तटकरेंसोबत सविस्तर चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या चर्चेमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

Thackeray Group Warns Admin Over NEET Paper Leak; Shiv Sena Style Protest!

नीट पेपर फोडून लाखो विद्यार्थ्यांच्या करीयरची राखरांगोळी करणाऱ्या गुन्हेगारांच्या घरावर तातडीने बुलडोझर फिरवावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. . या संदर्भात ठाकरे गटाच्या शेतकरी सेनेचे प्रदेश संघटक वसीम देशमुख, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, अजय उर्फ गोपू पाटील सावंत, उध्दवराव गायकवाड, गणेश शिंदे, शंकर घुगे, भानुदास जाधव, युवासेना विस्तारक दिलीप…

Read More

मराठा तरुणांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय:अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींचा निधी; बेरोजगार युवकांना आधार

मराठा समाजातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठा…

Read More

पुण्यात आगामी काळात पाणी संकट गडद होण्याची शक्यता:एल निनोचा फटका बसणार? धरणसाठा झपाट्याने घटला, पुढचे दिवस कठीण

पुणेकरांसाठी चिंतेची बातमी समोर आली असून वाढत्या उष्णतेमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे पुणे शहर आणि परिसराला पाणी देणाऱ्या धरणसाखळीतील साठा धोक्याच्या पातळीपर्यंत घसरू लागल्याचे चित्र आहे. आगामी काही दिवसांत पावसाने उशीर केला तर पुण्यावर…

Read More

हिंगोलीत दारूच्या नशेत दोन तरुणांचा मृत्यू:एकाचा कालव्यात बुडून तर दुसऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यात दारुच्या नशेत दोन वेगळ्या घटनेमध्ये एकाने गळफास घेऊन तर एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी व कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 20 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील अरविंद वाघमारे (35) हा कळमनुरी तालु्क्यातील सुकळी वळण शिवारात नातेवाईकांकडे गेला होता.यावेळी…

Read More

पश्चिम बंगालमधील सर्व मदरशांमध्ये 'वंदे मातरम' गाणे अनिवार्य:सरकारला अहवाल सादर करतील सर्व मदरसे; आधी फक्त राष्ट्रगीत आणि बांगला गाणी गात होते

पश्चिम बंगाल सरकारने राज्याच्या अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व मदरशांमध्ये ‘वंदे मातरम’ गायन अनिवार्य केले आहे. 19 मे रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, हा नियम सरकारी मॉडेल मदरसे, सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त मदरशांना तात्काळ लागू होईल. नवीन आदेशानंतर आता वर्ग सुरू होण्यापूर्वी सकाळच्या प्रार्थना सभेत (असेंबलीमध्ये) वंदे मातरम गाणे आवश्यक असेल. सर्व…

Read More