- Marathi News
- National
- JEE Advanced Tomorrow… Thousands Of Students Confused Due To 75 Percent Criteria, Crisis For Students Who Qualified For JEE Main
नवी दिल्ली14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

सीबीएसईच्या १२वीच्या निकालानंतर मुलांमध्ये सुरू झालेली संभ्रमाची स्थिती अधिक गडद होत आहे. पहिल्यांदाच अवलंबण्यात आलेल्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रक्रियेमुळे यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.२०% राहिली, जी गेल्या ७ वर्षांतील सर्वात कमी आहे.
यादरम्यान, रविवारी म्हणजेच १७ मे रोजी जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा होणार आहे, परंतु हजारो विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांनी जेईई मेनमध्ये ९० ते ९९ पर्सेन्टाईलपर्यंत गुण मिळवले आहेत, ते जेईई ॲडव्हान्स्डसाठी पात्र असूनही १२ वी बोर्ड परीक्षेत ७५% गुणांचे निकष पूर्ण करू शकत नाहीत. असे विद्यार्थी आता आयआयटी व एनआयटीमधील प्रवेशास वंचित राहू शकतात.
दोन मोठ्या बदलांमुळे वाढली अडचण
- सीबीएसईने या वर्षापासून १०वीच्या विद्यार्थ्यांना दोन परीक्षांचा पर्याय आणि ३ विषयांमध्ये सुधारणा परीक्षेची सुविधा दिली आहे. तर १२ वीचे विद्यार्थी एकाच विषयात सुधारणा परीक्षा देऊ शकतात. अशा परिस्थितीत, विज्ञान शाखेच्या ज्या विद्यार्थ्यांचे पीसीएमच्या तिन्ही विषयांमध्ये गुण कमी आले आहेत, त्यांच्यासाठी केवळ एका विषयाची परीक्षा देऊन ५% ते १०% ची तफावत भरून काढणे जवळपास अशक्य मानले जात आहे. पुरवणी परीक्षा १५ जुलै रोजी आयोजित केल्या जातील.
- पुनर्मूल्यांकन प्रक्रिया १८ मे पासून सुरू होईल. ही प्रक्रिया ३ टप्प्यांत होईल. मार्क्स व्हेरिफिकेशनसाठी ५०० रु. प्रति विषय, स्कॅन कॉपीसाठी ७०० रु. प्रति उत्तरपत्रिका आणि पुनर्मूल्यांकनासाठी १०० रु. प्रति प्रश्न असे शुल्क लागेल.