Headlines

Maharashtra Rain Break Likely From July 8; Farmers Advisory Issued


जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले असले, तरी आता राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ जुलैपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी होणार

.

हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१५ जुलैपर्यंत) राज्याच्या काही भागांत धुवांधार पाऊस झाला असला, तरी दुसऱ्या पंधरवड्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी (अत्यल्प) राहू शकते. पाऊस कमी होणार असल्याने राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांना काहीसा उकाडा सहन करावा लागू शकतो.

मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी राज्यातील अनेक भागांत अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांचा समावेश आहे, जिथे अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणीची घाई नको

हवामानाची ही बदलती स्थिती पाहता राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नियमावली आणि आवाहन जारी केले आहे. “राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक आणि पुरेसा पाऊस झालेला नाही, तिथल्या शेतकऱ्यांनी केवळ ढगाळ वातावरण पाहून पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत जमिनीत पेरणीयोग्य पुरेसा ओलावा निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी थांबवावी. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या कोरड्या स्पेलचा अंदाज घेऊनच आपल्या शेतीकामांचे आणि पुढील पिकांचे नियोजन करावे,” असे कृषी विभागाने म्हटले आहे.

पावसामध्ये होणाऱ्या या घटमुळे रखडलेल्या शेतीकामांना गती मिळण्याची शक्यता असली, तरी कमी पावसाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र पुढील पिकांसाठी पावसाच्या दुसऱ्या मोठ्या स्पेलची वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा…

पावसाचा अंदाज पाहूनच पेरणीचा निर्णय घ्या:बियाणे-खतांचा पुरेसा साठा उपलब्ध, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – दत्तात्रय भरणे

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असला तरी काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक पावसाची परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच राज्यात बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. सविस्तर वाचा…

शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.