रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी
शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून…