Headlines

पुण्यातील भोरमध्ये माणुसकीला काळिमा!:65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या, गावकऱ्यांचा संताप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाने आधी अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले असून, या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका…

Read More

सारोळ्यात लोकसहभागाने शेतरस्ता; शेतात जाण्यासाठीची गैरसोय थांबणार:तीन लाखांचा निधी जमा करून केले रस्त्याचे काम, उपक्रमाचे कौतुक‎

प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील सारोळा शिवारात शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात खड्डे आणि असमतल रस्ता यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकदा संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. मात्र, अडचणींसमोर हार न मानता सारोळा गावातील…

Read More

प्रगतिशील शेतकरी:दुष्काळी माळरानावर केशर आंब्याची बाग; 35 एकरांतून 1 कोटी उत्पन्न, लातूरच्या शेतकऱ्याचा जिद्दी प्रयोग

मराठवाडा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पाचवीला पुजलेला दुष्काळ. पण याच मातीत जिद्द असेल तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या एका तरुण शेतकऱ्याने घालून दिले. निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे या शेतकऱ्याने आपल्या 35 एकर खडकाळ माळरानावर 12 हजार केशर आंब्यांची लागवड केली. विशेष म्हणजे, या वर्षी केवळ 6 हजार झाडांतून…

Read More

पुणे महामार्गावर वऱ्हाडींच्या बससह चार वाहनांचा अपघात:35 जखमी, पळवे खुर्द शिवारातील घटना, कारला वाचवण्याच्या प्रयत्नात लक्झरी बसचालकाचे नियंत्रण सुटले

. नगर-पुणे महामार्गावर गुरुवारी सकाळी भीषण साखळी अपघात झाला. लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी उत्साहात आळंदीकडे निघालेल्या राजळे परिवाराच्या आनंदावर विरजण पडले. पळवे खुर्द शिवारातील हॉटेलसमोर लक्झरी बस, कंटेनर, एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण साखळी अपघातात ३० ते ३५ जण जखमी झाले. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील वऱ्हाडी लक्झरी…

Read More

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी…

Read More

कबड्डीने बदलले अकोल्यातील गावाचे नशीब:3,500 लोकसंख्येच्यागावात 35,000 क्षमतेचे स्टेडियम; 25 तरुणांना सरकारी नोकरी मिळाली

अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील केळीवेळी गावाची ओळख आता ‘कबड्डीचे गाव’ म्हणून बनली आहे. अवघ्या ३,५०० लोकसंख्या असलेल्या या गावात ३५ हजार क्षमतेचे स्टेडियम आहे, जिथे कबड्डीचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सामने होतात.आता गावच्या महिलाही दिवाळीला माहेरी जाण्याऐवजी गावात होणाऱ्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेणे पसंत करतात. गावातील जवळपास प्रत्येक घरात एक कबड्डी खेळाडू आहे. कबड्डीने येथील तरुणांच्या…

Read More

आरक्षण उपवर्गीकरण- डॉ. चलवादींचे सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन:दलित समाजात फूट नको, बौद्ध समाजावर अन्याय टाळावा

महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी या मुद्द्यावर सर्वसमावेशक आणि समतोल विचार करण्याचे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाची भूमिका…

Read More

विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, आचारसंहिता लागू:स्थानिक यंत्रणेत लगबग; 25 मे रोजी अधिसूचना, 18 जूनला मतदान, 22 ला निकाल

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना आता कोणत्याही नव्या विकासकामांची घोषणा करता येणार नाही. तसेच, त्यांना सरकारी वाहनांचा…

Read More

जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;‎गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त‎:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस‎

प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भोंदू खरातचा मुक्काम नाशिकच्या कारागृहात, शिर्डी न्यायालयाकडून 14 दिवस न्यायालयीन कोठडी

भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शिर्डी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातच्या भोंदूगिरीचा गेम ओव्हर झाला असताना अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल असल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. खरातला शनिवारी शिर्डी न्यायालयात हजर करण्यात…

Read More