Headlines

गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले:मुकेश अंबानींना मागे टाकले; ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत 19व्या स्थानावर पोहोचले

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.59 लाख कोटी रुपये) झाली आहे. आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांची एकूण संपत्ती 90.8 अब्ज डॉलर (म्हणजे सुमारे 8.42 लाख…

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे यश:स्ट्रॉबेरी प्लेटच्या धर्तीवर "ट्रायकोडर्मा' कंटेनरला मिळाले भारतीय पेटंट!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा रोगशास्त्रज्ञ डॉ. पोपट खंडागळे यांनी स्ट्रॉबेरीच्या प्लेटप्रमाणे जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’ तयार करण्यासाठी एक विशेष रचना प्रारूप विकसित…

Read More

Punjab ED Raid Update; Bhagwant Mann AAP Minister Sanjeev Arora

Marathi News National Punjab ED Raid Update; Bhagwant Mann AAP Minister Sanjeev Arora | Chandigarh Gurugram चंदीगड39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमधील आम आदमी पार्टी (AAP) सरकारचे मंत्री संजीव अरोरा यांच्यावर शनिवारी ईडीने छापा टाकला. सूत्रांनुसार, त्यांना चंदीगडमधील सरकारी निवासस्थानातून अटकही करण्यात आली आहे. हा छापा चंदीगडमधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी, दिल्ली आणि गुरुग्राममधील ठिकाणांवर टाकण्यात आला…

Read More

रोहित पवारांचा PM मोदींना टोला:पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतके जगात कुणीही माहीर नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री…

Read More

23 terrorists declared, including Musaddiq, who carried out the raid on Shri Ram temple, including 17 Pakistanis, 6 Indians

Marathi News National 23 Terrorists Declared, Including Musaddiq, Who Carried Out The Raid On Shri Ram Temple, Including 17 Pakistanis, 6 Indians नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने शनिवारी पाकिस्तान आणि पीओकेमधून भारतविरोधी नेटवर्क चालवणाऱ्या २३ दहशतवाद्यांना बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले. यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि आरएसएस मुख्यालयाची रेकी करणारा जैश-ए-मोहंमदचा…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी- सुप्रीम कोर्टात बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? भूषण गवई- न्यायाधीश माणूसच, एखादा शब्द निघून जातो, विपर्यास होतो

सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान ‘झुरळ’ आणि ‘परजीवी’ या शब्दांचा वापर झाला. यावरून देशभरात गदारोळ झाला. बेरोजगारांना झुरळ म्हटले, हे योग्य आहे का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रणव गोळवेलकर यांनी भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांची ऑनलाइन मुलाखत घेतली. त्यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली. 2026 मध्ये देशातील एखाद्या…

Read More

पुण्यात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या:मोका जामिनाला विरोध, अवैध धंद्यातील नुकसानीतून वाद

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे रमेश रेड्डी या तरुणाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी रमेशवर नऊ गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी हा त्याचा भाऊ जॉन उर्फ विक्रम रेड्डी याच्या खुनातील आरोपी साबीर शेख, त्याची…

Read More

सुधारित निवृत्तीवेतन योजनेचे पडसाद; जुनी पेन्शन लागू न झाल्यास आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक; आरडीसींना दिले निवेदन‎

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेविरोधात सोमवारी पडसाद उमटले. या योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. या योजनेतील तरतुदी कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात असून त्या पूर्णतः अन्यायकारक व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठाम आरोप संघटनेने केला…

Read More

पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश‎

वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित…

Read More

सरकारकडून ओबीसींच्या हक्कांना नख:राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट – विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर ओबीसींच्या हक्कांना नख लावल्याचा आरोप केला आहे. राखीव प्रवर्गातील तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचा कट महायुती सरकारने केला आहे. याद्वारे सरकारने ओबीसींच्या हक्कांनाच नख लावले आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार…

Read More