Headlines

जागतिक महासागर दिन विशेष‎:महासागर खेचतोय मान्सूनचे ढग, पावसाची 8 टक्के तूट शक्य; 10 वर्षांत तिसऱ्यांदा कमी पाऊस‎




महासागरातील तापमानातील बदलानुसार‎पर्जन्यमानात मोठे बदल पहायला मिळतात.‎मागील दहा वर्षातील पर्जन्यमान पाहता,‎अहिल्यानगर जिल्ह्यात दर दोन ते चार‎वर्षांनी पर्जन्यमान कमी झाल्याचे दिसून‎येते. यापूर्वी २०२३ मध्ये कमी पाऊस झाला‎होता. आता पुन्हा २०२६ मध्ये पॅसिफिक‎महासागराचे तापमान‎ ०.५ अंशापेक्षा अधिक वाढल्याने,‎ एलनिनोचा प्रभाव निर्माण झाला. त्यामुळे‎ अहिल्यानगरसह भारतातील मान्सूनचे‎ ढग तिकडे ओढले जाऊन आठ ते दहा‎टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज‎ आहे. मे महिन्यात, समुद्रातील तापमान‎२९.८ अंश सेल्सिअस होते.‎ पॅसिफिकमध्ये तापमान वाढून, कमी दाब‎निर्माण झाला असल्याने, विषुवृत्तीय‎क्षेत्रातील हवेच्या प्रवाहाची दिशा बदलत‎आहे. परिणामी जे वारे भारतासह‎अहिल्यानगरकडे ओलावा घेऊन‎यायला हवे होते, ते पॅसिफिकच्या‎महासागराकडे खेचले जात आहेत.‎त्यामुळे हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्याची तागद व आर्द्रता कमी होऊन‎पर्जन्यमानावर परिणाम होऊन एलनिनोचे‎संकट गडद झाले आहे.‎ एलनिनोचा प्रभाव असला तरी‎शेतकऱ्यांनी पीक नियोजन कसे करावे,‎यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने‎मार्गदर्शक अहवाल तयार केला आहे.‎एल निनो पॅसिफिक महासागरात उष्णता‎वाढवून हिंद महासागरातील मान्सून‎वाऱ्यांची खेचण्याची ताकद कमी करतो,‎ज्यामुळे भारताचे मान्सून चक्र‎विस्कळीत होऊ शकते. जिल्ह्याचा‎विचार करता, मागील दहा वर्षांत २०१५‎मध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळी‎स्थिती निर्माण झाली होती. तसेच २०१८‎व २०२३ मध्येही तिव्र टंचाईचा सामना‎करावालागला. परंतू, दर दोन ते तीन‎वर्षानंतर पुन्हा दमदार पाऊस झाल्याचे‎आकडेवारीवरून स्पष्ट होते.‎ पाऊस कमी पडेल, तुम्ही हे करा!‎ पावसाचे आगमन उशिरा झाल्यास घाईने पेरणी करणे टाळावे,‎किमान ८०-१०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये.‎जमीनीचे तापमान ४० ते ५० अंशावर आहे. या काळात पेरणी‎केल्यास उगवन कमी होते. त्यामुळे जमिनीचे तापमान किमान १८‎ते २५ असायला हवे. जमिनीच्या खोलीनुसार पिकांची निवड‎करा; हलक्या जमिनीत बाजरी, मटकी, हुलगा तर मध्यम ते खोल‎जमिनीत तूर, सूर्यफूल, रब्बी ज्वारी यांसारख्या पिकांचे नियोजन‎करावे, असा सल्ला आपत्कालीन पीक व्यवस्थापनात दिला आहे.‎ पाणी आणि ओलावा व्यवस्थापन‎ पावसाचा खंड पडल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरी-वरंबे,‎बंदिस्त वाफे आणि मुलस्थानी जलसंधारणाचे उपाय अवलंबावेत.‎जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांच्या दोन ओळींत‎पाचट, काडीकचरा यांसारख्या अवशेषांचे आच्छादन वापरावे,‎ज्यामुळे २५ ते ३० मि.मी. ओलाव्याची बचत होते.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *