Headlines

"तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका..":आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर तरुणांसह राष्ट्रगीत गाणार




नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष आणि विविध संघटनांसोबतच आता शिवसेना ठाकरे गटानेही आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन जंतरमंतरवरील या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना बळ दिले आहे. याचबरोबर, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही याप्रश्नी आक्रमक पवित्रा घेत, “तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा,” असे म्हणत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जोरदार समर्थन दिले आहे. आदित्य ठाकरे यांनीही आक्रमक पवित्रा घेत, “तुमचे सळसळते रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच हवा,” अशी ठाम भूमिका मांडली आहे. तसेच, मुंबई पोलिसांमध्ये अजूनही संवेदनशीलता टिकून असून त्यांनी दिल्ली पोलिसांप्रमाणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला नाही, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या संयमाचे कौतुक केले. यापुढील दिशा स्पष्ट करताना, येत्या 24 तारखेला सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र येऊन राष्ट्रगीत गायन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. “कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली न येता, थेट भारताच्या तिरंग्याखाली आपण पुन्हा एकत्र येऊया आणि राष्ट्रगान गाऊया,” असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केले आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान- उद्धव ठाकरे दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, अभिजीत दिपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिले पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे. महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे. फक्त एका राजीनाम्याने चालणार नाही पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अभिजीतने ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथे लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे स्मरण ठेवावे लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपले युद्ध सुरू झाले आहे. फक्त एका राजीनाम्याने चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *