![]()
आषाढी यात्रेच्या नियोजित कामाला प्रशासनाकडून सुरुवात केली असून शहरात विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोडा उचलला आहे. बुधवार (दि. १ जुलै) रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. यंदाची आषाढी यात्रा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली आहे. यात्रा नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे, नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार शहरातील अतिक्रमणे हटवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना पंढरपूर शहरात रहदारीचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. पंढरपूर शहरात अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना व विक्रेत्यांना अतिक्रमण काढण्याबाबतच्या सूचना नगरपालिका प्रशासनाने दिल्या होत्या, मात्र सदर अतिक्रमण संबंधितांनी काढले नाही. त्यामुळे कारवाई करावी लागत आहे. शहरातील सर्वच भागात अतिक्रमणाची कारवाई पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही, प्रांताधिकारी सचिन इतापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांनी सांगितले. ^ मंगळवार ३० जूनपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असून, २५ पोलीस व नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश आहे. या पथकाने जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह छत्रपती शिवाजी चौक ते अर्बन बँक, अर्बन बँक ते इंदिरा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक ते सावरकर चौक तसेच भाई राऊळ पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड येथील अतिक्रमणे काढली आहेत. – महेश रोकडे, मुख्याधिकारी या भागातील अतिक्रमणे काढली
Source link
पंढरीत पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम:आषाढी यात्रेची तयारी, जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह पथक रस्त्यावर