![]()
सुस्ते (ता. पंढरपूर) येथील चव्हाणवस्तीवर गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी डोक्यावर घागरी आणि हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चव्हाणवस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकदा शेजारच्या शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा विंधन विहिरीवरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मोर्चामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अखेर सरपंच कसबे यांनी आंदोलक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. संपूर्ण गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत योजना मंजूर झाली होती मात्र, संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. ठेकेदाराने जाणीवपूर्वक कामात हलगर्जीपणा केल्याची संतप्त चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. जलजीवनच्या संथ कारभाराचा फटका
Source link
पाण्यासाठी चव्हाण वस्तीवरील महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा:सरपंच कसबे यांच्याकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन