![]()
साहित्य हे विवेक, सृजनशीलता आणि मुक्त आविष्कारातून निर्माण झाले तर ते रसिकांना निखळ आनंद देण्याबरोबरच शिष्टाचार आणि भ्रष्टाचाराची चिकित्सक दृष्टीही प्रदान करते. साहित्य हे विविध अनुभवांची खाण असून मुक्त होण्याचे खुले व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक (पुणे) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-बार्शी यांच्या वतीने आयोजित प्रा. व. न. इंगळे पुरस्कृत राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले होत्या. यावेळी रमेश पाटील व ॲड. सतीश सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन म. सा. प. अध्यक्ष पां. न. निपाणीकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रविराज फुरडे यांनी केले, तर सूत्रसंचालन नीता देव यांनी केले. बी. आर. देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश गव्हाणे, आबासाहेब घावटे, प्रकाश महामुनी, दिलीप कल्याणी, शारदा पानगावकर, प्रा. कल्याण घळके, सुवर्णा शिवपुरे, मंगल माळी, प्रदीप कुमार कांदे, गिरीश सोनार, सिद्धेश्वर धुमाळ, मयुरी बाबर आणि प्रदीप गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी आणि साहित्यिका डॉ. स्मिता पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच बार्शीतील ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ कोळेकर आणि सुमन चंद्रशेखर यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले. साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यांचा सन्मान
Source link
साहित्य अनुभव अन् विचारांचे व्यासपीठ:बार्शीमध्ये राजर्षी शाहू महाराज साहित्य पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात