Headlines

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले‎




शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी अजीम इनामदार, नगरसेवक डॉ. युसूफ खान हादीक खान व संतप्त नागरिकांनी मजीप्रा कार्यालयाबाहेर ४५ अंश तापमानात भर उन्हात ठिय्या आंदोलन केले. यापूर्वी २०२४ आणि मार्च २०२६ मध्ये सुद्धा प्रशासनाने नियमित पाणीपुरवठा करू, असे लेखी आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांची बोळवण केली होती. मात्र, महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या आंदोलकांनी अधिकाऱ्यांकडे केली. घागर मोर्चा काढणार ^प्रशासकीय अधिकारी फोन उचलत नाहीत आणि कंत्राटी कर्मचारी “आमच्या अधिकार क्षेत्रात नाही’ अशी उडवाउडवीची उत्तरे देतात. जर संपूर्ण अकोट शहराला समसमान आणि नियमित पाणी मिळाले नाही, तर महिलांना सोबत घेऊन थेट तीव्र घागर मोर्चा व आमरण उपोषण छेडले जाईल. – रेश्मा परवीन मोहम्मद अजीम इनामदार, नगरसेविका.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *