![]()
कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. 25) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर आणखी घसरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यापारी असोसिएशनने सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच युद्धाच्या परिणामामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाली आहे, बांगलादेशमध्ये गेल्या एक ते दीड वर्षापासून कांदा जात नाही. उन्हामुळे कांदा खराब होत असून त्यामुळे दर घसरले आहेत. त्यात लिलाव बंद या संकटाची भर पडणार आहे. भाव आणखी कमी होणार सध्या जिल्हाभरात कांद्याला जेमतेम 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता लिलाव बंदमुळे दर आणखी खाली येण्याची आहे. 15 हजार क्विंटल आवक लासलगाव बाजार समितीत सध्या रोज दहा ते पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यातील 90 टक्के कांदा हा वाहनातून इतर राज्यांत पाठवला जातो. त्यासाठी वाहने नसल्याने लिलाव बंद करण्यात येत आहेत. ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्याने सौदे तुटले निफाड तालुक्यात उन्हाचा पारा 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. अशातच इंधन मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाला कांदा इतर ठिकाणी पाठवण्यासाठी गाड्या उपलब्ध होत नाहीत, तसेच घेतलेली ऑर्डर वेळेत पोहोचत नसल्यामुळे अनेक सौदे तुटत आहेत. – प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव
Source link
डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद:लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र, साेमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी