![]()
मनमाड-नांदगाव मार्गावरील पानेवाडी आणि नागापूर परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर असलेल्या इंधन प्रकल्पांसमोर दोन्ही बाजूंनी टँकर चालक आपले टँकर अत्यंत बेशिस्तपणे उभे करत असल्याने दररोज
.
वाहतुकीला अडथळा येत असल्याने कोंडी हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला नाशिक व मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, तीनही इंधन प्रकल्पांच्या समोर टँकरच्या लांबच लांब रांगा रस्त्यावरच लावल्या जात असल्याने वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यासोबतच, याला जबाबदार धरून प्रकल्प प्रशासनावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.