Headlines

मोदी यंत्रणेच्या बळावर आलेले पंतप्रधान:भारतीय जहाजावर हल्ला झाला तरी पंतप्रधान गप्प का?, शहांनी त्यांच्यावर उपकार करणाऱ्यांचेच पक्ष फोडले- राऊत




अमित शहा यांच्यावर ज्या पक्षाने उपकार केले आहेत त्यांचा पक्ष फोडण्याचे काम अमित शहा यांनी केले हे कपट कारस्थान नाही तर काय आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विक्रम केला नाही. पंडित नेहरू हे 1947 पासून 16 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या मंत्रिमंडळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मंत्री होते. तर सरदार पटेल हे त्याच काळात देशाचे गृहमंत्री होते मग ही लोकं त्यांना पण देशाचे गृहमंत्री मानत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायदामंत्री माणायला मोदी तयार नाहीत जर नेहरुंचा 4 वर्षांचा तो कालखंड त्यांना मान्य नसेल तर, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, नेहरुंनी 16 वर्षांमध्ये देश उभा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजून खूप काम करायचे आहे. त्यांनी अजून काम करण्यास सुरूवात केलेली नाही. ते कट कारस्थान करण्यातच व्यस्त आहेत. नेहरुंनी हे कधी केले नाही. त्यामुळे मोदींचे भाषणं आम्ही काही गांभीर्याने घेत नाही. 2014 ला लोकांनी त्यांना निवडून दिले. 2019 आणि 2024 मध्ये जनतेने पराभूत केले पण यंत्रणेचा वापर करत ते निवडून आले. 2024 मध्ये त्यांना बहुमतच नाही. ते निवडून आलेले पंतप्रधान नाही.

शरद पवारांनी पुढाकार घ्यावा संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस देशात मजबूत झाला पाहिजे. काँग्रेसमधून गेलेल्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. या संदर्भात शरद पवारांनी पुढाकार घेत नेतृत्व केले पाहिजे. काँग्रेस विचारधारेतून बाहेर पडलेले आणि आजही काँग्रेससोबत असलेल्या पक्षांनी काँग्रेससोबत आले पाहिजे. तर जनतेच्या हिताचे काम करता येईल. ट्रम्प यांच्या विधानांना गांभीर्याने घेऊ नका संजय राऊत म्हणाले की, ट्रम्प मोदी यांच्याबद्दल काही म्हणाले हे आम्ही ऐकले नाही. पण ट्रम्प कोणाचीही वाह वाह करतात आणि दोन दिवसानंतर वेगळी भूमिका घेतात. भारताविषयी त्यांनी काय काय म्हटले हे सर्वांना माहिती आहे. कालच ओमानमध्ये भारतीय जहाजावर हल्ले झाले अमेरिकेच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आमचे टेल टँकर बुडवले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्द सुद्धा काढला नाही, हे केवळ निषेध व्यक्त करतात.

राऊतांचे ट्विट काय? संजय राऊत म्हणाले की, प्रभु श्रीराम मन से अत्यंत दुखी और व्यथित हैं… अयोध्या लौटकर क्या यही दर्दनाक दृश्य देखना था? हृदय काँप उठता है सोचकर। समझ नहीं आता, लेकिन श्रीराम आज पुकार रहे हैं… प्रेम की गहरी, करुण साद दे रहे हैं। जैसे कह रहे हों – “बेटा, आ जा..” अयोध्या एक बार जाना ही पड़ेगा, उन चोर मंडली का समाचार लेने के लिए। श्रीराम की यही इच्छा, यही पुकार प्रतीत हो रही है। हे प्रभु, आपके दुख को हम महसूस कर रहे हैं… जय श्री राम असे म्हणत राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *