Headlines

रोहित पवारांचं आंदोलन म्हणजे प्रसिद्धीसाठीचं नाटक:गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल, शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप




पंढरपुरात सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून केवळ प्रसिद्धीसाठीचे “नाटक” असल्याचा आरोप करत पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “रोहित पवारांना अभिनय चांगला जमत असल्यामुळे ते आंदोलनाच्या माध्यमातून नाटक करत आहेत. हे आंदोलन आहे की एखाद्या चित्रपटाचे शूटिंग, असा प्रश्न पडतो.” त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला “नटरंग चित्रपटाच्या शूटिंगसारखी ही एक्टिंग सुरू आहे,” असा टोला लगावला. एक-दोन महिने आंदोलनावर बसू द्या- पडळकर यावेळी पडळकर यांनी थेट सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनालाच आवाहन केले. “जोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून पूर्ण एफआरपी मिळत नाही, तोपर्यंत रोहित पवारांनी उपोषण सुरू ठेवावे. पोलिसांनी आंदोलनस्थळी कडक सुरक्षा ठेवून त्यांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये,” असे ते म्हणाले. “एक-दोन महिने आंदोलनावर बसू द्या, तेव्हाच आंदोलनाची खरी परीक्षा होईल,” असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करताना पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान जर कुणी केले असेल, तर ते पवार कुटुंबाने केले आहे. शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारखान्यांबाबत उत्तर द्यावे.” दरम्यान, महायुती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी लागू करावी, या मागणीसाठी रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळत असताना, पडळकर यांच्या टीकेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुलं म्हणतायत बाबा घरी या, पण माघार नाही!: रोहित पवारांचा सरकारला इशारा, कर्जमाफीच्या अटी हटेपर्यंत आंदोलन सुरूच पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली. कृषी मंत्र्यांकडून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी कर्जमाफीतील जाचक अटी हटवून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची विनाअट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *