Headlines

वाढलेली शक्ती दाखवून मित्रपक्षाच्या 3 जागा खेचण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू:विधान परिषदेसाठी फॉर्म्युला, भाजप-12, शिवसेना-3, राष्ट्रवादी-2




विधान परिषद निवडणुकीत १७ जागांच्या वाटपाची प्राथमिक बोलणी नुकतीच झाली. त्यात भाजप-१२, शिवसेना (शिंदेसेना) -३, राष्ट्रवादी (अजित पवार गट) -२ असे जागा वाटप ठरले. वाढलेली शक्ती दाखवून मित्रपक्षाच्या तीन जागा खेचण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होईल. यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. त्या एका जागेसाठीही मतदान होईल. यात स्थानिक स्वराज्य संस्थातून आमदार निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषद आणि मनपाचे नगरसेवक मतदान करतात. २०२०मध्ये जेव्हा या १६ जागांसाठी निवडणूक झाली होती. तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित पक्ष होते. त्यावेळी सत्तेत नसलेल्या भाजपने ६, सत्तेत असलेल्या शिवसेनेने ५, राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेसने २ जागा मिळवल्या होत्या. जानेवारी-फेब्रुवारीत झालेल्या मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे संख्याबळ २०२०च्या तुलनेत खूप वाढले आहे. ही वाढलेली शक्ती दाखवून काही जागा अदलाबदलीचाही प्रस्ताव ठेवला आहे. सूत्रांनी सांगितले की, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. तिकीट मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षात गटबाजी सुरू आहे. त्यामुळे घोडेबाजार तसेच अंतर्गत गटबाजी, संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांनी १७ जागा महायुती म्हणून लढाव्यावत, यावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या निवडणुकीत भाजप १२, शिवसेना ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. मात्र, हा निर्णय अंतिम नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार अंतिम शिक्कामोर्तब करतील. शिंदेसेनेच्या पवित्र्याने घोषणा लांबणीवर सूत्रांनी सांगितले की, जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा करावी, असा जोरदार प्रयत्न भाजपकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र, शिंदेसेनेच्या पवित्र्याने घोषणा लांबणीवर पडली आहे. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अधिकृत घोषणा करत नाहीत, तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जागावाटपात सिटिंग-गेटिंग समीकरणापेक्षा पक्षाची ताकद आणि समन्वयाला सर्वोच्च प्राधान्य आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *