26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या
अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…