Headlines

26 ग्रामपंचायतींना 15 व्या वित्त आयोगातून ई-रिक्षा:शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही घनकचरा संकलनासाठी धावणार घंटागाड्या

अमरावती जिल्ह्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींना ई-रिक्षा प्रदान करण्यात आले आहेत. या ई-रिक्षांची रचना विशेषतः दिव्यांग व्यक्तींनाही चालवता येईल अशा पद्धतीने करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला गती मिळणार आहे. या वाहनांमुळे घरोघरी कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला वेग…

Read More

नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी:पाण्यावर चर्चा करता, मग आमचे प्रश्न कधी सोडवणार? गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा सवाल

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या ‘जलसंवाद परिषदे’त नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असतानाच, प्रकल्पग्रस्तांनी अचानक जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. अखेर सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमस्थळावरून…

Read More

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे:शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे आवाहन

अमरावती ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे. खोलापूर येथील शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कदम यांनी नुकतीच खोलापूर पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील एकंदरित परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटलांची कार्यशाळा…

Read More

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More

वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात 'कृती समिती' आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध

तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने तीव्र आंदोलन केले. ‘महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती’च्या वतीने तिवसा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवण्यात आला. महावितरण प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळी ते मार्च अखेरपर्यंतची वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास बोनस देण्याचे…

Read More

ट्रोलिंगवर आलियाच्या समर्थनात समोर आली आई सोनी राजदान:म्हटले- सोशल मीडियावर खूप द्वेष; कान्समध्ये आलियाला दुर्लक्षित केल्याचा दावा

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 च्या रेड कार्पेटवरून अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. या ट्रोलिंगवर आता आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खरं तर, लेखिका शुनाली खुल्लर श्रॉफ यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करून आलियाला पाठिंबा दिला होता. शुनालीने ट्रोल…

Read More

सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या…

Read More

पुणे जीसीसी हब बनणार:पुढील 4-5 वर्षांत शहर अत्याधुनिक ओळख निर्माण करेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

पुणे शहराची जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) म्हणून ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात आहेत. पुढील चार ते पाच वर्षांत पुणे एक अत्याधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते महंमदवाडी येथे समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुंढवा…

Read More