Headlines

मलकापूर हादरले!:दाम्पत्याला चाकू-विळ्याचा धाक दाखवून लुटले; शेतात नेत दोघांकडून विवाहितेवर अत्याचार‎

मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन अज्ञात नराधमांनी शेतातील घरात घुसून एका दाम्पत्याला चाकू आणि विळ्याचा धाक दाखवून लुटले. त्यानंतर पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेला बळजबरीने जवळच असलेल्या शेतात नेऊन दोघांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना 17 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली असून, या…

Read More

'रामायण' ट्रेलर लाँच कार्यक्रम:रणबीरने सनी देओलच्या पायांना स्पर्श केला; बाबा रामदेव यांनी ₹4000 कोटींच्या बजेटवर चिमटा काढला

चित्रपट ‘रामायण: प्रथम संकल्प’ चा ट्रेलर शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक नितेश तिवारी, निर्माता नमित मल्होत्रा आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. निर्मात्यांनी घोषणा केली की ट्रेलर २४ जुलै रोजी जगभरातील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. या कार्यक्रमात भगवान रामाची भूमिका साकारणारे रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, सनी देओल,…

Read More

धक्कादायक:वाशी तालुक्यात शालेय पोषण आहाराच्या सोयाबीन वडीत आढळल्या अळ्या; 301 विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

18 मुलांना शिजवून देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या असल्याचा गंभीर प्रकार शनिवारी(दि.18) तालुक्यातील पारा जिला परिषद शाळेत घडला. या बाबत पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर रात्री साडेआठ वाजता अन्न व औषध प्रशासनाचे पथक दाखल होऊन शाळेत असलेल्या व विद्यार्थ्यांच्या डब्यातील अन्न पदार्थाचे नमुने घेतले आहेत. पारा जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून भात…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाचे अमरावती शहरात तीव्र पडसाद:भाजपचा सुंदरकांड, नवनीत राणा यांचे हनुमान चालीसा पठण‎

अयोध्येचे राम मंदिर आणि इतर तिर्थस्थळांच्या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचार, चोरीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शनिवारी नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद अमरावतीतही उमटले. उद्धव ठाकरे यांनी केव्हाच हिंदुत्व सोडले म्हणत अमरावतीत भाजपने राजकमल चौकात सुंदरकांड केला. तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी हनुमानगढी येथे हनुमान चालिसा…

Read More

आयुक्त ऑन रोड; अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे दिले निर्देश:डॉ. गोंदावले यांनी केली अतिक्रमण, नाले, उद्यानांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची शनिवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. नाले, उद्याने, परिसराची स्वच्छता, अतिक्रमणाची स्थिती तसेच नागरी सुविधा आदी समस्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले. पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कुल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायी…

Read More

लहर-लहर:आपला मेंदू आधुनिक, पण विचार शतकानुशतके जुन्या विश्वासांवर आधारित आहेत

मानवाने कदाचित आपल्या संपूर्ण इतिहासात कधीच इतकी प्रगती केली नाही, जितकी गेल्या शंभर-दोनशे वर्षांत केली आहे. त्याने समुद्राची खोली मोजली, आकाशाची उंची गाठली, चंद्रावर पाऊल ठेवले आणि अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या ग्रहांपर्यंत आपली याने पाठवली. त्याने अणूची रचना समजून घेतली, मानवी जनुकीय आराखडा (जीनोम) वाचला आणि अशी यंत्रे बनवली जी शिकूही शकतात आणि निर्णयही घेऊ…

Read More

आदिवासींच्या विकासासाठी प्रशासन, सामाजिक संस्थांमध्ये समन्वय पाहीजे:आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांचे प्रतिपादन‎

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा व सामाजिक संस्थांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. दोन्ही यंत्रणआंनी योग्य समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशो . चिखलदऱ्याच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी…

Read More

अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन आवश्यक:शीलवंशलंकार यांचे प्रतिपादन स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण‎

आसक्तीचा त्याग करून अनित्य, दुःख आणि अनात्म या तत्त्वांचे चिंतन करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रियभाव आणि आसक्तीचा अतिरेक कमी होतो, तेव्हा शोक आणि भय यांचाही अंत होतो, असे प्रतिपादन भन्ते शीलवंशलंकार यांनी केले. . अंकुर बनसोड यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील बुद्ध टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून भिक्खू सीलवंसलंकार, मनपाच्या माजी…

Read More

पर्यावरण संवर्धनात सांगळूदकर महाविद्यालय विभागामध्ये प्रथम:राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ही शिक्षण संस्था‎

येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था, द्वारा संचालित दर्यापुरच्या जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने अत्यंत प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, महाविद्यालयाने अमरावती विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक, तर राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दुहेरी मानाचा बहुमान प्राप्त केला आहे. हा पुरस्कार २०२४ मध्ये…

Read More

बोगस बियाणे, दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी ‘अन्नत्याग’:न्यायालयीन लढाईसाठी सत्ताधारी शिंदे सेना करणार सहकार्य‎

बोगस बियाणे व दुबार पेरणीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढल्यास सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहे. शेतकरी एल्गार समितीवतीने अन्नदात्यांसाठी ‘अन्नत्याग आंदोलन” पुकारण्यात आले आहे. बार्शीटाकळी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आले. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेत…

Read More