Headlines

इथे दुकान चालवायचे असेल तर 2 लाख द्या:खंडणी नाकारल्याने कामगाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, शिवसेना महिला नेत्याला अटक

नवी मुंबईतील राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. भंगार व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून तब्बल 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख पूजा बनसोडे हिला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे पूजा बनसोडे आणि तिच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याला आणि त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बेदम मारहाण…

Read More

Katrina Kaif Birthday Celebration | Vicky Kaushal & Vihan Photos

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 16 जुलै रोजी आपला 43 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कतरिना कैफने पती विकी कौशल आणि मुलगा विहानसोबत तिच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर शेअर केली. पोस्टमध्ये विकीसोबतचे तिचे फोटो आणि मुलगा विहानसोबत घालवलेले काही खास क्षण दिसले. फोटोंसोबत कतरिनाने एक भावनिक नोटही लिहिली. तिने लिहिले, “मी नेहमी देवाचे आभार मानते की त्याने…

Read More

नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षण कार्यक्रम सुरू:'लोक भवन' उद्यानात वर्षभर चालणार निसर्गाची शाळा

नागपूरच्या ‘लोक भवन’ जैवविविधता उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षभर चालणाऱ्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सेमिनरी हिल्सच्या 49 हेक्टर वनक्षेत्रात हे उद्यान पसरलेले आहे. पूर्वी ते राजभवन जैवविविधता उद्यान म्हणून ओळखले जात असे. हे उद्यान स्थानिक वृक्ष, औषधी वनस्पती, फुलपाखरे, पक्षी…

Read More

बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीत खोदकाम सुरू:7 किलोमीटरचा मार्ग जाणार पाण्याखालून, भारतातील पहिला खाडीखालचा रेल्वे बोगदा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता जबरदस्त वेग मिळाला असून, देशातील पहिल्या खाडीखालच्या रेल्वे बोगद्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये एका भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने हे खोदकाम सुरू केले आहे. विशेष म्हणजे, भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. बुलेट ट्रेनसाठी आता…

Read More

अभिषेक म्हणाले- बंगालमध्ये पोलिसांच्या गणवेशात चोरी:माझे कार्यालय पाडले, भाजपचे गुंड सामान घेऊन गेले; केस प्रलंबित असताना बुलडोझर कारवाई का?

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी रविवारी आरोप केला की, भाजप सरकारच्या काळात पश्चिम बंगाल पोलीस स्वतःच कायदा मोडणारे बनले आहेत. दक्षिण 24 परगणा येथील अमतला येथील त्यांचे कार्यालय पाडल्यानंतर एक दिवसांनी त्यांनी हे विधान केले. शनिवारी जिल्हा प्रशासनाने इमारतीचा पुढील भाग बुलडोझरने पाडला होता. हे बांधकाम परवानगीशिवाय केले असल्याचा आरोप होता. इमारत पाडल्यानंतर रात्रीचा एक…

Read More

मुंबई कोस्टल रोडवर 'पोर्शे'चा भीषण अपघात:भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडवर रविवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव पोर्शे या लक्झरी स्पोर्ट्स कारचा ताबा सुटल्याने ती थेट रस्त्याच्या दुभाजकाला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र, या भीषण अपघातात एक मोठी दैवी किमाया पाहायला मिळाली. कारमधील एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे चालक आणि…

Read More

राम मंदिर देणगी चोरीवर राहुल यांचे मोदींना पत्र:म्हटले – तुमची शांतता स्वीकारार्ह नाही, ट्रस्टची खाती सार्वजनिक करा; टिन्नूची आजही चौकशी

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. खाती सार्वजनिक करावीत, जेणेकरून प्रत्येक भक्ताला कळेल की देणगीचा वापर कुठे आणि कसा झाला. चौकशीत जे कोणी जबाबदार आढळतील, त्यांची चौकशी निश्चित करावी….

Read More

राऊतांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली:त्यांना हत्या, बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा अधिकार नाही- नवनाथ बन

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांशी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे हत्या आणि बलात्कारासारखे शब्द वापरण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. विचारांची हत्या आणि पक्ष संपवण्याचं काम राऊत यांनी केले असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर राहुल गांधींची गुलामगिरी करण्यापलीकडे राऊतांकडे दुसरं कोणतंही काम उरलेलं नाही. नवनाथ…

Read More

पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक:विरोधी पक्षाचे खासदार 15 मिनिटांत बाहेर पडले, नंतर पुन्हा आले; बंडखोर खासदारांना बैठकीत येण्यास विरोध

मान्सून अधिवेशनाच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. बैठक सकाळी 11 वाजता संसद भवन ॲनेक्सीमध्ये झाली. बैठकीत काँग्रेस, सपा, टीएमसी, द्रमुक (DMK) सह अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. मात्र 15 मिनिटांनंतर विरोधी खासदार बाहेर पडले आणि त्यांनी बैठकीतून सभात्याग केला. विरोधी खासदारांचा आरोप आहे की, सरकारने टीएमसीच्या बंडखोर 20 खासदारांच्या गटाला…

Read More

उद्धव ठाकरे कधी जमिनीवर आलेच नाहीत, आता काय येणार?:श्रीकांत शिंदेंचा टोला, म्हणाले- वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी म्हणून रुग्णालयात हलवले

उद्धव ठाकरे आतापर्यंत कधीही जमिनीवर आलेले नाहीत, ते आता काय येणार? त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीकास्त्र सोडले. तसेच संसदेत एनडीएची ताकद वाढली असून, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 13 खासदार महाराष्ट्राचे…

Read More