Headlines

Nitin Gadkari on Media Credibility Crisis

नागपूर5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सर्व संस्थांमध्ये माध्यमांसमोर विश्वासार्हतेचे संकट ही सर्वात मोठी समस्या आहे. आज सर्वात मोठी गरज आहे की माध्यमांनी आपली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करावी. गडकरी शनिवारी IIM नागपूर मीडिया कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये ‘माध्यमे, नेतृत्व आणि नवी जागतिक व्यवस्था’ या विषयावर बोलत होते. त्यांनी…

Read More

डीजे बंदीनंतर एफडीएच्या महाप्रसाद नियमांवरून वादळ:सर्व धर्मांना अन्नसुरक्षेचे नियम समान लागू करण्याची मंदिर महासंघाची मागणी; हिंदू संघटनांनी घेतला तीव्र आक्षेप

धार्मिक उत्सवांमधील डीजे बंदीचा वाद अजून ताजा असतानाच, आता अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) एका नव्या भूमिकेमुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एफडीएने महाप्रसाद व भंडाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांवरून हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी…

Read More

ताजुद्दीन बाबा दर्ग्याच्या संदलमध्ये डीजेवर बंदी:प्यारे खान यांचे महाराष्ट्रातील सर्व दर्ग्यांना डीजे न वापरण्याचे आवाहन

नागपूर येथील जगप्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या २६ व्या संदल उत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्रद्धाळूंच्या सुरक्षेचा आणि धार्मिक पावित्र्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आणि ताजुद्दीन बाबा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी ही माहिती दिली. त्यांनी सर्व भाविकांना यंदाच्या संदलमध्ये डीजे न आणण्याचे आवाहन केले…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भावनिक आवाहन:म्हणाले- हंडी फोडा, पण माणूस जपा; थरांपेक्षा गोविंदांची सुरक्षितता महत्त्वाची

धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जपलेली परंपरा आणि ठाण्याच्या गोविंदा संस्कृतीची ओळख असलेल्या टेंभी नाका येथील मानाच्या दहीहंडी उत्सवात यंदाही प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या दहीहंडीला सलामी देण्यासाठी आलेल्या गोविंदा पथकांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदांच्या सुरक्षेवर विशेष भर दिला. “हंडी फोडा, पण माणूस जपा,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी उत्सवातील थरांपेक्षा गोविंदांमधील एकजूट,…

Read More

अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला अखेर दिलासा:नागेश भोईरच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मंत्री प्रताप सरनाईक उचलणार, कुटुंबालाही आर्थिक मदत

मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी उत्सव मानवी मनोऱ्यांच्या उंचीमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र याच उत्सवात गोविंदा जखमी होण्याच्या घटना सातत्याने समोर येतात. 2009 सालच्या अशाच एका दुर्घटनेत थरावरून कोसळल्यामुळे नागेश भोईर हा गोविंदा गंभीर जखमी झाला होता आणि तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून आहे. यंदाच्या उत्सवातही काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, मंत्री प्रताप सरनाईक यांनी…

Read More

वंचित, दिव्यांग मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात साजरी केली ‘आपली दहिहंडी’:शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने आयोजन केले; शिवकन्या बेळगे यांना माता यशोदा सन्मान

पुणे येथे वंचित, दिव्यांग आणि विशेष मुलांसाठी ‘आपली दहिहंडी’ हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने हा उपक्रम आयोजित केला होता. धर्मवीर शंभूराजे अनाथाश्रमातील विशेष मुला-मुलींनी ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुलाच्या प्रांगणात हा उत्सव साजरा झाला. पारंपरिक बँडचे सूर, ढोल-ताशांचा गजर आणि गोविंदांच्या जयघोषाने वातावरण उत्साहाने…

Read More

300 गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप:जेधे सोशल आणि इंद्राणी बालन फाउंडेशनने सायकल दहीहंडीतून केली मदत

पुण्यात जेधे सोशल फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशनने ‘अभिनव बालगोपाळ सायकल दहीहंडी’ उपक्रमाचे आयोजन केले होते. शुक्रवार पेठेतील पंचमुखी मारुती मंदिराजवळ अनोख्या सायकल दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने ३०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, उत्सव हे सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या माध्यमातून…

Read More

स्टेनोग्राफर पद ‘मृत संवर्ग’ करण्याला विद्यार्थ्यांचा विरोध:नांदेडमध्ये उपोषणाचा 11वा दिवस, एक विद्यार्थी रुग्णालयात दाखल

राज्य सरकारने लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पद ‘मृत संवर्ग’ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील लघुलेखनाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज 11 वा दिवस असून, उपोषणकर्ते भगवान दत्तराव पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न या…

Read More

गरवारे महाविद्यालयातील वाचन कक्षाला प्रा. द. मा. मिरासदार यांचे नाव:माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, 'मिरासदार यांनीच आम्हाला बहुश्रुतता दिली'

द. मा. मिरासदार हे खूप अभ्यासू आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रसन्नता चेहऱ्यावर आणि बोलण्यात दिसायची. मिरासदार आणि गरवारे महाविद्यालयातील शिक्षकांनीच आम्हाला बहुश्रुतता देत घडवले. महाविद्यालयातूनच वाचन आणि चर्चा करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे द. मा. मिरासदार यांच्या आठवणी फक्त जन्मशताब्दी वर्षातच नाही, तर पुढेही जपल्या जातील, असे गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय…

Read More

हिंजवडी मेट्रो सुरू होण्यास उशीर:माजी आमदार मोहन जोशींचा मुख्यमंत्र्यांना सवाल, केवळ आश्वासने नको, मेट्रो कधी धावेल ते सांगा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी हिंजवडी मेट्रो कधी धावणार, असा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष मेट्रो कधी सुरू होईल, हे सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार जेव्हा पिंपरी चिंचवड भागाला भेट देतात, तेव्हा ते हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात,…

Read More