सुसंस्कार शिबीर ही आजच्या काळाची खरी गरज:सुसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. रघुनाथ वाडेकर यांचे प्रतिपादन
आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानप्रधान युगात मुलांमध्ये असंवेदनशीलता वाढीस लागली असून मोबाईलचे व्यसन आणि नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यात चांगले संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता तत्वज्ञान प्रणालीनुसार सुसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूल चे संचालक डॉ….