देवदेवतांच्या नावाखाली उद्योगपतींसमोर लोटांगण:सुपीक जमिनींवरून 'शक्तीपीठ' नेण्यास राजू शेट्टींचा विरोध
नागपूर ते गोवा हा प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग” म्हणजे सर्वसामान्यांचा विकास नसून उद्योगपतीच्या फायद्यासाठी आखलेला एक स्वतंत्र रस्ता आहे, असा आरोप स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.नागपुरातील कोळसा गोव्यातील मडगाव बंदरापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीसाठी कोट्यवधींचा निधी उभारण्यासाठी जनतेच्या करातून हा अट्टाहास सुरू असल्याची टीका त्यांनी केली. देव-धर्म आणि विकासाचा मुलामा देऊन…