Headlines

नरेंद्र मोदी यांचा कॉलम:चला, सगळे मिळून स्त्रीशक्तीला सक्षम करूया‎




21 व्या शतकाच्या विकास यात्रेत आपला भारत एका‎महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक क्षणाकडे वाटचाल करत‎आहे. येत्या काळात आपण लोकशाहीला अधिक‎बळकट करणाऱ्या एका मोठ्या पुढाकाराचे साक्षीदार‎होणार आहोत. समानता, सर्वसमावेशकता आणि‎लोकसहभागाविषयी असलेली आपली राष्ट्रीय‎बांधिलकी एका नव्या रूपात समोर येईल असा हा क्षण‎आहे. आपल्या देशाच्या संसदेला एक महत्त्वाची‎जबाबदारी पार पाडायची आहे. आपली लोकशाही‎अधिक व्यापक आणि प्रातिनिधिक बनवेल. संसदेला‎त्यादृष्टीने पाऊल टाकायचे आहे. संसदेचा हा निर्णय‎महिलांच्या राजकीय सहभागाला नवी ऊर्जा देईल.‎ हा क्षण यासाठीही खास आहे. कारण देशातील वातावरण‎सण, उत्साह आणि सकारात्मकतेने भारलेले असतानाचा‎हा क्षण आला आहे. येत्या काळात भारताच्या वेगवेगळ्या‎भागांत अनेक सण साजरे केले जातील. आसामचे लोक‎रोंगाली बिहू साजरा करणार आहेत. ओडिशात महा‎बिशुबा पणा संक्रांतीचा उत्सव साजरा होईल.‎ पश्चिम बंगालमध्ये ‘पोइला बैशाख”ने बंगाली नववर्षाची‎सुरुवात होईल. केरळमध्ये विषुचा सण मोठ्या उत्साहात‎साजरा केला जाईल.‎ तमिळनाडूचे लोक पुथांडूची आतुरतेने वाट पाहत आहेत.‎तर पंजाब आणि उत्तर भारताच्या इतर भागांत लोकांना‎बैसाखी सणाची प्रतीक्षा आहे. हे पवित्र सण प्रत्येकामध्ये‎नवी आशा निर्माण करणार आहेत. भारतासोबतच‎जगभरात हे सण साजरे करणाऱ्या सर्वांना मी मनःपूर्वक‎शुभेच्छा देतो. याच काळात 11 एप्रिलपासून महात्मा फुले ‎‎यांच्या 200 व्या जयंतीचे कार्यक्रमही सुरू होतील. 14 ‎‎एप्रिलला आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‎‎जयंती साजरी करू. या दोन्ही तारखा आपल्याला‎सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या त्या मूल्यांची ‎‎आठवण करून देतात. आधुनिक भारताची दिशा यांनी ‎‎ठरवली आहे.‎ याच प्रेरणादायी प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर 16 एप्रिल रोजी ‎‎संसदेची ऐतिहासिक बैठक होणार आहे. महिला आरक्षण ‎‎लागू करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण विधेयकावर चर्चा‎करून ते मंजूर करण्यासाठी हे विशेष अधिवेशन‎ बोलावण्यात आले आहे. याला केवळ एक कायदेशीर ‎प्रक्रिया म्हणणे म्हणजे त्याचे महत्त्व कमी लेखण्यासारखे ‎‎ठरेल. हे भारतातील कोट्यवधी महिलांच्या आकांक्षांचे ‎‎प्रतिबिंब आहे.‎ आपली स्त्री शक्ती देशाच्या जवळपास निम्म्या‎लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. राष्ट्रउभारणीत त्यांनी ‎‎मोलाचे योगदान दिले आहे. आज देशाच्या प्रत्येक क्षेत्रात ‎‎नारीशक्ती एक उदाहरण बनत आहे. विज्ञान आणि ‎‎तंत्रज्ञानापासून ते उद्योजकतेपर्यंत, खेळापासून ते सशस्त्र ‎‎दलांपर्यंत, संगीतापासून ते कला क्षेत्रापर्यंत महिला आपली ‎‎भक्कम ओळख निर्माण करत आहेत.‎ माता-भगिनींना पुढे जाण्याच्या अधिकाधिक संधी‎मिळतात. तोच समाज प्रगती करतो. याच विचाराने गेल्या‎११ वर्षांत महिला सक्षमीकरणासाठी अनुकूल वातावरण‎तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी‎सातत्याने प्रयत्न केले गेले आहेत. शिक्षणाच्या वाढत्या‎संधी, उत्तम आरोग्य सेवा, आर्थिक समावेशकता आणि‎पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचल्यामुळे महिलांचा सहभाग‎अधिक मजबूत झाला आहे.‎ मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही राजकारण व विधिमंडळांमध्ये‎महिलांचे प्रतिनिधित्व समाजात त्यांच्या भूमिकेच्या‎तुलनेत कमी राहिले आहे. ही उणीव आता दूर केली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पाहिजे. कारण जेव्हा महिला प्रशासन चालवण्यात आणि‎प्रशासकीय निर्णयांमध्ये भाग घेतात, तेव्हा त्यांचा अनुभव‎आणि दृष्टिकोन खूप उपयोगी पडतो. यामुळे चर्चा तर‎समृद्ध होतेच. शिवाय प्रशासनाचा दर्जा सुधारण्यासही‎मदत होते. महिलांचा सहभाग वाढवणे हा केवळ‎प्रतिनिधित्वाचा विषय नाही. हा आपल्या लोकशाहीला‎अधिक संवेदनशील, अधिक संतुलित आणि अधिक‎जबाबदार बनवण्याचा एक प्रयत्न आहे.‎ गेल्या अनेक दशकांत लोकशाही संस्थांमध्ये महिलांना‎त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी वारंवार प्रयत्न‎झाले आहेत. समित्या स्थापन केल्या गेल्या. विधेयकांचे‎मसुदे मांडले गेले. पण ते कधीच मंजूर होऊ शकले‎नाहीत. तरीही, कायदेमंडळात महिलांचे प्रतिनिधित्व‎वाढले पाहिजे, यावर नेहमीच व्यापक सहमती राहिली‎आहे. सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने एकमताने ‘नारीशक्ती‎वंदन कायदा” मंजूर केला होता.‎ हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास प्रसंगांपैकी एक‎राहिला आहे. आता 2029 च्या लोकसभा निवडणुका व‎आगामी काळातील राज्यांच्या विधानसभा निवडणुका या‎महिला आरक्षणाच्या तरतुदींसह घेतल्या जाव्यात, ही‎काळाची गरज आहे.‎ महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची ही संधी‎राज्यघटनेच्या मूळ भावनेशी खोलवर जोडलेली आहे.‎आपल्या घटनाकारांनी एका विशिष्ट समाजाची कल्पना‎केली होती. त्यानुसार समानता केवळ संविधानातच‎नसेल, तर ती प्रत्यक्ष व्यवहारातही आणली जाईल.‎कायदेमंडळात महिलांचा सहभाग निश्चित करणे, ही बाब‎ती संकल्पना साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक‎महत्त्वाचे पाऊल आहे.‎ आता हा निर्णय आणखी टाळता येणार नाही. आज भारत‎पूर्ण आत्मविश्वास आणि दृढ संकल्पाने पुढे जात आहे.‎त्यामुळे आपल्या संस्थांनी सर्व नागरिकांच्या विशेषतः‎देशाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या‎महिलांच्या आकांक्षांचा सन्मान करणे आवश्यक आहे.‎मी सर्व पक्षांच्या खासदारांना विनंती करतो की, त्यांनी‎आपल्या स्त्री शक्तीसाठी उचलल्या जाणाऱ्या या‎महत्त्वपूर्ण पावलाला पाठिंबा द्यावा.‎ ही आपली जबाबदारी…‎हा कोणत्याही एका सरकारचा, पक्षाचा‎किंवा व्यक्तीचा विषय नाही. हा संपूर्ण‎राष्ट्राचा विषय आहे. सर्वांनी मिळून या‎गोष्टीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे‎आणि ते प्रत्यक्षात आणले पाहिजे. स्त्री‎शक्तीविषयी हीच आपली जबाबदारी‎आहे. म्हणूनच महिला आरक्षण विधेयक‎मंजूर करण्यासाठी सर्वांची सहमती असणे‎अत्यंत आवश्यक आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *