Headlines

इंधन दरवाढीविरोधात अमरावतीत काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने:ग्रामीण भागात खदखद; डिझेलच्या महागाईने शेतकरी होरपळणार‎




केंद्र सरकारच्या वतीने सलग चौथ्यांदा करण्यात आलेल्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने आज, मंगळवार, २६ मे रोजी जयस्तंभ चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, महागाईचे भीषण संकट ओढवले असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “संपूर्ण देश महागाईच्या आगीत होरपळत असताना देशाचे पंतप्रधान मात्र विदेश दौरे करण्यात आणि ‘मेलोडी’ चॉकलेटचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.सलग चार वेळा झालेल्या दरवाढीमुळे अमरावतीत इंधनाचे दर वाढल्याचे आंदोलकांनी सांगितले. पेट्रोल (प्रति लिटर) १०५ वरून ११२ झाले. डिझेल (प्रति लिटर) ९० वरून ९८ झाले आहे. केंद्र सरकारच्या निष्काळजी आणि ढासळलेल्या आर्थिक कारभारामुळे आज संपूर्ण देशावर हे संकट आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढेल. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणखी महागणार आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर सर्वसामान्यांचे जगणे असह्य होईल, असे मतही यावेळी उपस्थित आंदोलकांनी व्यक्त केले. त्यामुळेच केंद्र सरकारने ही अन्यायी इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह मनपा विरोधीपक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक विक्की वानखडे, युवक काँग्रेसचे निलेश गुहे, नितीन काळे, अनिकेत ढेंगळे, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, विनोद मोदी, राजेंद्र वर्मा, संजय चौधरकर, सलीम मिरावाले, अरुणकुमार जैस्वाल, माजी महापौर अशोक डोंगरे, अभिनंदन पेंढारी, गजानन जाधव, गजानन राजगुरे, विठ्ठल मरापे, संजय बोबडे, अमोल उगे, अरुण बनारसे, संदेश सिंघई, शिल्पा राऊत, कांचन खोडके, शिरीन खान, जयश्री मरापे, किरण चांदवडकर, डॉ. अर्चना आत्राम, प्रथमेश गावंडे, अनिकेत क्षीरसागर, चेतन खोपे, कार्तिक कडुस्कर, मयुर तायडे, सतीश गवई, प्रीतम ठाकूर, प्रकाश नगराळे, शेखर सुरमवार, अशफाक खान, रफीक भाई चिकुवाले, राजाभाऊ हाडोळे, अनिकेत ढेंगळे, सुरेश रतावा, राजीव भेले, प्रशांत महल्ले, प्रदीप अरबट, ज्ञानेश्वर झोंबाडे, दिनेश खोडके, विजय वानखडे, नाना बारबुद्धे, गजानन रडके, मोहन पुरोहित, श्रीधर पुरोहित यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इंधन आणि घरगुती गॅस दरवाढीचा फटका शहरांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकांनाही बसला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात डिझेलचा वापर करावा लागतो. परंतु एकतर महाग. त्यातही तुटवडा. अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही इंधन दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांच्या मते निकट भविष्यात ठिकठिकाणी आंदोलने होणार आहेत. ग्रामीण काँग्रेसमध्येही खदखद : नागरिकांनाही शंका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *