Headlines

Prafulla Patel Statement on NCP Leadership Crisis


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, राजकीयदृष्

.

अजित पवारांनंतर नेतृत्व बदलावर चर्चा

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वात मोठे बदल करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर पार्थ पवार यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर अधिक जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या बदलांनंतर पक्षाच्या अंतर्गत कार्यपद्धतीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाकडे सादर कागदपत्रांमुळे चर्चांना उधाण

दरम्यान, निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या एका पत्रात प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांसमोर अधिकृत पदनाम नसल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसने हा केवळ टंकलेखनाचा (टायपोग्राफिकल) दोष असल्याचे स्पष्ट केले असले, तरी या घटनेमुळे पक्षातील मतभेदांच्या चर्चांना अधिक जोर मिळाला.

निर्णयप्रक्रियेत केंद्रीकरण वाढल्याची चर्चा

पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये निर्णयप्रक्रिया अधिक केंद्रीकृत होत असल्याची भावना असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संघटनात्मक नियुक्त्या आणि आगामी निवडणुकांतील उमेदवारी वाटपात कुटुंबाशी जवळीक असलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जाईल, अशीही काही वरिष्ठ नेत्यांची चिंता असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीत प्रभाव कायम ठेवण्याचे आव्हान

महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील राजकीय प्रभाव कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. अजित पवार यांच्या प्रभावी वाटाघाटी क्षमतेअभावी पक्षाला नव्या रणनीतीची गरज भासू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

सामूहिक नेतृत्वावर भर देण्याची गरज

पक्षातील सूत्रांच्या मते, एका व्यक्तीचा उत्तराधिकारी शोधण्यापेक्षा सामूहिक नेतृत्व मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. वरिष्ठ नेत्यांचा अनुभव आणि नव्या नेतृत्वाची संघटनात्मक जबाबदारी यांचा समन्वय साधल्यास पक्षाची एकजूट टिकून राहील आणि कार्यकर्त्यांमध्येही विश्वास निर्माण होईल. तसेच अजित पवार यांचा राजकीय वारसा आणि विकासाभिमुख भूमिका पुढे नेण्यास मदत होईल, असेही पक्षातील नेत्यांचे मत आहे.

दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार-पार्थ पवार असा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी, निवडणूक आयोगाशी झालेल्या पत्रव्यवहारात सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पदे केवळ ‘गटनेते’ (अनुक्रमे राज्यसभा आणि लोकसभा) अशी नमूद करून त्यांच्या आधीच्या अधिकृत पदांचा उल्लेख टाळला होता. हा संभ्रम चार महिने उलटूनही दूर झालेला नाही. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये वाढते केंद्रीकरण आणि पवार कुटुंबातील निष्ठावंतांना दिले जाणारे झुकते माप, यामुळे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी काळात पक्षातील ही पोकळी आणि अंतर्गत कलह शांत करून सामूहिक नेतृत्व निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातमी वाचा…

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षातूनच थेट आव्हान!:राष्ट्रवादीत अंतर्गत कलह उफाळला; प्रफुल्ल पटेल म्हणाले- त्या नोटीसला फार महत्त्व देण्याचे कारण नाही

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. मात्र, आता त्यांच्या या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.