![]()
देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात आता विरोधी पक्षांनी देखील सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभरात आंदोलन सुरू केले आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेना ठाकरे गटकडून व मनसेकडून मोर्चा काढण्यात येत आहे. या प्रकरणावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले, जंतर मंतरवर लहान लहान मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या प्रायवेट पार्टवर इजा करण्याच्या पोलिसांनी प्रयत्न केला. मुलांना बेदम मारहाण केली. हे मुलं कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हते, ते त्यांची लढाई लढण्यासाठी तिथे आले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने पुढे एक पाऊल जाऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा करून घ्यायला पाहिजे होता. एक परीक्षेसाठी जवळपास 10 लाख रुपये खर्च करावा लागतो आणि तो पेपर लीक झाला आणि त्यामुळे अनेक मुलांचे भविष्य खराब झाले आणि त्यातून अनेकांनी आत्महत्या केली. नागपूरमध्ये देखील आत्महत्या केल्या पण ते दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. हे मुलं देशाचे भविष्य आहे आणि या देशाच्या भविष्याबद्दल जो राग या मस्तावलेल्या मोदी सरकारमध्ये पाहायला मिळाला आणि त्या दृष्टीकतून चित्र आपण देशभरात पाहतो आहोत. आपण 75 वी लोकशाही साजरी करतोय. जंतर मंतरवर आपण पाहिले की या तरुणांनी राग व्यक्त केला आहे. तिथे राहुल गांधी का गेले नाही, असा प्रश्न विचारला जातोय, त्याला राजकीय रंग द्यायचा नव्हता म्हणून ते तिथे गेले नव्हते. आज देशभरात आपण शांतते आंदोलन करत आहोत. कारण आम्ही गोडसे नाही तर महात्मा गांधींच्या विचारांसोबत आहोत. आम्ही या तरुणांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्च काढत आहोत. 56 इंच छाती कुठे गेली? पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे जर आपण 2014 च्या पूर्वीचे भाषण ऐकले तर त्यात पेपरफुटीचा सुद्धा मुद्दा होता. मग जवळपास 3 वेळचे पंतप्रधान आहात, तर सुधारणा का नाही केली? हे आंदोलन सुरू असताना लोकसभेतून पळून जातात, त्या मुलांसाठी त्या मैदानात का नाही उतरलात? 56 इंच छाती तेव्हा कुठे गेली? कायदा बदलणार आहोत असे ते व्हिडिओमधून सांगतात, लोकसभेत का नाही बोलू शकले? पळकूटा प्रधानमंत्री या देशाने पाहिलेला आहे.
Source link
'56 इंचाची छाती कुठे गेली? देशाने पळकुटा पंतप्रधान पाहिला':नीट पेपरफुटीवरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात