![]()
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात विकत घेतलेल्या कचोऱ्यांमध्ये चक्क उंदराच्या लेंड्या आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळ आणि अस्वच्छतेविरोधात धडक मोहीम राबवली जात आहे. हॉटेल, बेकरी तसेच मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, याची तपासणी केली जात आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ किंवा अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जात आहे. मात्र, या कारवायांनंतरही काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येत आहे. नेमके प्रकरण काय आहे एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. घरी आल्यानंतर कचोरी खाताना त्यांना संशय आला. कचोरी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.यातील दोन कचोऱ्या मुलांनी खाल्ल्या असल्याचा आरोपही ग्राहकाने केला आहे. विशेष म्हणजे, खरेदी केलेल्या चार- पाचउंदराच्या लेंड्या सापडल्या. मी या कचोऱ्या दुकानात आणून दाखवल्यावर त्यांनी ते पार्सल फेकून दिले आहे. माझ्याकडे यांना ऑनलाईन केलेल्या पेमेंटची पावतीही आहे. आता ते म्हणतात की, आमच्याकडून चूक झाली. पण आम्ही याची तक्रार करणार, आहोत या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छतेचे नियम कितपत पाळले जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कचोरीमध्ये आढळलेले पदार्थ नेमके उंदराच्या लेंड्या आहेत का, याची अधिकृत तपासणी झाल्यानंतरच स्पष्टता होणार आहे. मात्र, ग्राहकाने केलेल्या या दाव्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित दुकानाची तपासणी करून कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा.. सत्ताधाऱ्यांवर जरांगेंची नाराजी, सरकारकडून मनधरणीचे प्रयत्न:अंतरवालीत आज महत्त्वाची बैठक; शिंदे गटाचे मंत्री, भाजप नेतेही भेटीला
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. 29 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जरांगे यांनी दिल्यानंतर सत्ताधारी गटातील नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हेही जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून संवादाचे प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा …
Source link
वैजापुरात कचोरीत सापडल्या उंदराच्या लेंड्या:अन्न प्रशासनाच्या कारवाईनंतरही बेफिकिरी,व्हिडिओ व्हायरल