![]()
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध
.
राज्यात यापूर्वीच दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला आहे. या बदलाबाबत माहिती देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP) मधील तरतुदींनुसार या अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतरापेक्षा त्यांच्या ‘अध्ययन निष्पत्ती’वर (Learning Outcomes) हा आराखडा आधारित आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेत वाढ होईल.”
‘बालभारती’वर छपाईची जबाबदारी; पुस्तके वेळेत मिळणार?
सुकाणू समितीच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा अभ्यासक्रम समन्वय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर, नवीन पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीची आणि छपाईची जबाबदारी ‘बालभारती’वर सोपवण्यात आली आहे. येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसापर्यंत ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
शिक्षकांना मिळणार ‘हायटेक’ प्रशिक्षण
नवीन अभ्यासक्रम वर्गात प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. यासाठी ‘एससीईआरटी’तर्फे (SCERT) प्रथम राज्यस्तरीय प्रशिक्षण आयोजित केले जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हास्तरावर शिक्षकांना नवीन अध्यापन पद्धतीचे धडे दिले जातील. यामुळे शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत सुलभतेने पोहोचवणे सोपे होणार आहे.
दुसरी, तिसरी आणि चौथीनंतर आता सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने राज्यातील शिक्षण पद्धती अधिक आधुनिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.