![]()
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारीशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून, बचतगट व ‘उमेद’ अभियानाला शासनाचे भक्कम पाठबळ आहे. येणाऱ्या काळात उमेद अभियानाचा प्लॅटफॉ
.
‘लखपती दीदी’ निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये एकल महिलांसाठी सुरू झालेली चळवळ अधिक व्यापक करून या महिलांनाही कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रकल्प संचालक मंजुषा ठवरकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, संजय फंड, दीपक पठारे, नानासाहेब पवार, शरद नवले, बाबासाहेब चिडे आदी उपस्थित होते.