आमदार रासने यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट:ज्ञानेश्वर पालखी मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील भवानी पेठ येथील मुक्कामाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र, सोहळ्यात सहभागी होणाऱ्या…