उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठ परीक्षांच्या वेळेत बदलाची मागणी:सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी कुलगुरूंना केले पत्रव्यवहार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळेत बदल करण्याची मागणी सिनेट सदस्य अमोल देशमुख यांनी केली आहे. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. भारतीय हवामान विभागाने २५ एप्रिल ते १२ मे दरम्यान तापमान ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा…