Headlines

Admin

डिजिटल शाळेमध्ये एआयद्वारे शिक्षण; प्रवेशासाठी लागली रांग:8 काेटींतून तेलंगणात सरकारी शाळेचा कायापालट

एअर कंडिशन्ड कॅम्पस… ३६ स्मार्ट क्लास… आधुनिक कॉम्प्युटर व सायन्स लॅब… एआयद्वारे शिक्षण इनोव्हेशन रूम… लायब्ररी आणि रीडिंग झोन… स्वच्छ स्वच्छतागृहे… शुद्ध पाणी व डायनिंग हॉल… लिफ्ट… किचन गार्डनच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे… इयत्ता २ री ३ रीसाठी खेळ व उपक्रमांवर आधारित शिक्षण… कथा, फोनिक्स, ऑडिओ-व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल लर्निंगवर भर… हे सर्व अगदी मोफत. तेलंगणात राजधानी…

Read More

Pandharpur Acid Attack Amid Dy CM Visit; Law & Order Failure

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ॲसिड हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजे पंढरपुरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी भागवत अस . प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आपल्या कामावरून जात असताना एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे…

Read More

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची

माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या संस्कृतीची झलक:होजगिरी नृत्य, संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी सादर

पुण्यात ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आसामच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. बिहू नृत्याच्या वेगवान लय, तालबद्ध हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने पुणेकरांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली. हा कार्यक्रम भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता. भारती…

Read More

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण: भू-संपादनासाठी कोट्यवधींची तरतूद:पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी भू-संपादनाकरिता राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू असून, पहिला टप्पा पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. सध्या कात्रज-कोंढवा मार्गावर दर तासाला १५ हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ असते,…

Read More

Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans

2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच…

Read More

माहुली चोरमध्ये महिलांसाठी अगरबत्ती प्रशिक्षण शिबिर:ग्रामपंचायत आणि बचत गटाकडून उद्योजकतेला प्रोत्साहन

नांदगाव खंडेश्वरजवळील माहुली चोर येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. अमरावतीच्या स्वयंसिद्ध उद्योजक विकास अभियान मल्टीपर्पज फाउंडेशनचे तज्ज्ञ या शिबिरात महिलांना मार्गदर्शन करत आहेत. या एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिलांना अगरबत्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. डॉ. मोनिका उमक आणि नितीन पाटमासे यांनी…

Read More

एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम:म्हणाले – मी एकदाच ऑपरेशन केले, आता साध्या गोळीवर लोक माझ्याकडे येतील

“मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते….

Read More

बँक फसवणूक प्रकरणाची पोलिस फाईल गहाळ:आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाही, ग्राहकांचे खासदार वानखेडेंना साकडे

कर्मिक्षा निधी बँकेने फसवणूक केलेल्या ग्राहकांच्या प्रकरणाची गाडगेनगर पोलिस ठाण्यातून फाईल गहाळ झाली आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी या प्रकरणात चौकशी करून तक्रारदारांना दिलासा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीसाठी मूळ फाईलच उपलब्ध नसल्याने पोलिस अधिकारी अडचणीत आले आहेत. कर्मिक्षा निधी बँकेने राधानगर येथे कार्यालय उघडून भाजीपाला-फळ विक्रेते, इस्त्री करणारे, हातगाडी व कटलाचालक अशा…

Read More